शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

तेलुगू व्यावसायिकांना ‘घर वापसी’ची साद

By admin | Updated: January 11, 2015 01:17 IST

आंध्र सरकारने राज्यातील तेलंगणा भागात राहणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन न दिल्याने ते राज्याबाहेर गेले आहेत.

पंढरीनाथ कुंभार ल्ल भिवंडीआंध्र सरकारने राज्यातील तेलंगणा भागात राहणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन न दिल्याने ते राज्याबाहेर गेले आहेत. मात्र, आता स्वतंत्र तेलंगणा राज्य झाल्याने तेलंगणा सरकारने गुजरात व महाराष्ट्रातील तेलुगू कापड विणकर व व्यावसायिकांना ‘घर वापसी’ची हाक दिली आहे. त्यांनी खासदार, आमदार व अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ पाठवून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालविला आहे़ या वस्त्रोद्योग समितीने भिवंडीत दोन दिवस मुक्काम करून त्या भागातील यंत्रमाग व तेलुगू वसाहतींचे निरीक्षण केले. आंध्र प्रदेशाचे विभाजन झाल्यानंतर तेलंगणा राज्य स्थापन झाले. तेलंगणातील विस्थापित झालेले नागरिक राज्यात परतावेत, इतर राज्यांतील त्यांचे उद्योगधंदेदेखील तेलंगणांत स्थलांतरित करावेत या उद्देशाने तेलुगू नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. तेलंगणा वस्त्रोद्योग विभागाच्या शिष्टमंडळाने गुजरातमधील सुरत व भिवंडीत दोन दिवस मुक्काम करून त्या भागातील यंत्रमाग व तेलुगू वसाहतींचे निरीक्षण केले. तेलंगणात शेती, जागा आदी मालमत्ता असलेले अनेक तेलंगणावासी भिवंडीत राहत आहेत. शहरातील पद्मानगरमध्ये ‘अखिल पद्मशाली समाज मंगल हॉल’मध्ये ‘आॅल इंडिया पद्मशाली संघा’च्या (हैदराबाद) पॉवरलूम विभागांतर्गत शहरातील पॉवरलूम व्यापारी, कामगार, डिझायनर, मास्टर तसेच तेलंगणावासीयांची सभा झाली. या सभेत तेलंगणा सरकारच्या शिष्टमंडळातील खासदार कडियम श्रीहरी, आमदार वर्धन्ना पेट्टा, आरूरा रमेश, परकाला, चल्ला धर्मा रेड्डी, सल्लागार बी.व्ही. पापाराव, वस्त्रोद्योग आयुक्त जयेश रंजन यांनी मार्गदर्शन करून समस्त कापड उद्योजकांना तेलंगणात स्थलांतरित होण्यासाठी आवाहन केले. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी कापड व्यवसायासाठी सर्व सुविधा देऊन टेक्सटाइल पार्कसारख्या योजना राबविण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती शिष्टमंडळाने दिली. (प्रतिनिधी)महाराष्ट्राचे नुकसान : सध्या भिवंडी शहरात एकूण सात लाख यंत्रमागांपैकी तीन लाख यंत्रमाग तेलुगू व्यावसायिकांचे आहेत. कॉटन मार्केटमध्ये त्यांचे वर्चस्व आहे. असे असताना तेलंगणात हे मार्केट स्थलांतरित झाले तर भिवंडीसह राज्य शासनाला त्याचा चांगलाच फटका बसेल, असे जाणकार व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे.