शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही राहायचे कुठे ते सांगा?

By admin | Updated: June 13, 2016 03:40 IST

तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत. बेघरांनी पालिकेकडे पर्यायी जागा वा पुनर्वसनाची मागणी केली आहे. परंतु, पालिकेकडे निव्वळ पाच सदनिकाच उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बेघर नागरिकांना पुनर्वसनापासून वंचित राहावे लागणार आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात सुरू केलेली रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुवातीपासूनच मनमानी व नियमबाह्य पद्धतीने केली जात आहे. काँग्रेससह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पालिकेच्या हुकूमशाहीविरोधात संताप व्यक्त केला आहे. महामार्ग परिसर, पेणकरपाडा, मीरागाव, काशीगाव, मुन्शी कम्पाउंड, भार्इंदर पूर्वेचा फाटक मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा जोतिबा फुले मार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी पालिकेने अगदी ग्रामपंचायत काळापासूनच्या जुन्या इमारती, दुकाने, औद्योगिक गाळे नियम धाब्यावर बसवून तोडकाम सुरू केले आहे. यामध्ये नागरिक बाधित झाले असून त्यांचे अद्यापकुठेही पुनर्वसन केलेले नाही. त्यांना मोबदलादेखील मिळालेला नाही. वास्तविक, पुनर्वसन वा मोबदला नेमका काय द्यायचा, याबाबतचे पालिकेचे अद्याप धोरणच ठरलेले नाही.केवळ पोकळ आश्वासने देऊन पालिका नागरिकांना बेघर करत असून बाधित रहिवाशांना भविष्यात मोबदला मिळण्याची शक्यताही कमीच आहे. पालिकेला बेघरांसाठी आतापर्यंत केवळ १४१ सदनिकाच मिळाल्या आहेत. त्यापैकी सध्या केवळ २७ रिक्त असून त्यातही मुन्शी कम्पाउंडमधील १०, तर पेणकरपाडा येथील १२ अशा २२ बाधितांना दिल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेकडे केवळ पाच सदनिकाच शिल्लक राहणार आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरयोजनेतून मिळालेल्या ६३२ घरांमध्ये आधीपासूनच धोकादायक इमारतीतील रहिवासी तसेच बीएसयूपी योजनेतील रहिवासी राहत आहेत. तर, दुकाने वा गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे कोणताच पर्याय नाही. (प्रतिनिधी) >पालिकेकडे आकडेवारीच नाहीरस्तारुंदीकरणात किती बांधकामे तोडली, त्यात निवासी व व्यापारी किती, याची कोणतीही आकडेवारी पालिकेने अद्याप एकत्रित केलेली नाही. दुसरीकडे घरे, दुकाने तुटली म्हणून बाधितांनी पालिकेकडे अर्ज-विनंत्या सुरू केल्या असून त्याची संख्या शेकडोंच्या घरात आहे.>‘१८ ऐवजी १५ मीटर रस्ता करा’भार्इंदर पूर्व परिसरातील इमारती या ग्रामपंचायत काळापासूनच्या आहेत. अस्तित्वात असलेल्या इमारतींचा विचार न करताच १९९७ मध्ये विकास आराखडा मंजूर केल्याने सध्या येथे १८ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेली कारवाई थांबवावी. महासभेत १५ मीटर रस्ता ठेवण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी महापौर गीता जैन यांना केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी पाटील यांची मागणी फेटाळली आहे. आदल्या रात्री लाल पट्टे मारून जायचे व दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात फौजफाटा घेऊन इमारत पाडायची, अशी मोगलाई सुरू आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.