शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

आम्ही राहायचे कुठे ते सांगा?

By admin | Updated: June 13, 2016 03:40 IST

तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत.

मीरा रोड : मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात ठिकठिकाणी सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरण मोहिमेदरम्यान तोडलेल्या इमारती, जुनी घरे, गाळेधारकांना पर्यायी जागा देण्याच्या प्रशासन व सत्ताधारी भाजपाच्या वल्गना निव्वळ भूलथापा ठरणार आहेत. बेघरांनी पालिकेकडे पर्यायी जागा वा पुनर्वसनाची मागणी केली आहे. परंतु, पालिकेकडे निव्वळ पाच सदनिकाच उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे बेघर नागरिकांना पुनर्वसनापासून वंचित राहावे लागणार आहे. मीरा-भार्इंदर महापालिकेने शहरात सुरू केलेली रस्ता रुंदीकरण मोहीम सुरुवातीपासूनच मनमानी व नियमबाह्य पद्धतीने केली जात आहे. काँग्रेससह सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही पालिकेच्या हुकूमशाहीविरोधात संताप व्यक्त केला आहे. महामार्ग परिसर, पेणकरपाडा, मीरागाव, काशीगाव, मुन्शी कम्पाउंड, भार्इंदर पूर्वेचा फाटक मार्ग, बाळाराम पाटील मार्ग, नवघर मार्ग, महात्मा जोतिबा फुले मार्ग, स्टेशन रोड या ठिकाणी पालिकेने अगदी ग्रामपंचायत काळापासूनच्या जुन्या इमारती, दुकाने, औद्योगिक गाळे नियम धाब्यावर बसवून तोडकाम सुरू केले आहे. यामध्ये नागरिक बाधित झाले असून त्यांचे अद्यापकुठेही पुनर्वसन केलेले नाही. त्यांना मोबदलादेखील मिळालेला नाही. वास्तविक, पुनर्वसन वा मोबदला नेमका काय द्यायचा, याबाबतचे पालिकेचे अद्याप धोरणच ठरलेले नाही.केवळ पोकळ आश्वासने देऊन पालिका नागरिकांना बेघर करत असून बाधित रहिवाशांना भविष्यात मोबदला मिळण्याची शक्यताही कमीच आहे. पालिकेला बेघरांसाठी आतापर्यंत केवळ १४१ सदनिकाच मिळाल्या आहेत. त्यापैकी सध्या केवळ २७ रिक्त असून त्यातही मुन्शी कम्पाउंडमधील १०, तर पेणकरपाडा येथील १२ अशा २२ बाधितांना दिल्या जाणार आहेत. यामुळे पालिकेकडे केवळ पाच सदनिकाच शिल्लक राहणार आहेत. एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरयोजनेतून मिळालेल्या ६३२ घरांमध्ये आधीपासूनच धोकादायक इमारतीतील रहिवासी तसेच बीएसयूपी योजनेतील रहिवासी राहत आहेत. तर, दुकाने वा गाळेधारकांच्या पुनर्वसनासाठी पालिकेकडे कोणताच पर्याय नाही. (प्रतिनिधी) >पालिकेकडे आकडेवारीच नाहीरस्तारुंदीकरणात किती बांधकामे तोडली, त्यात निवासी व व्यापारी किती, याची कोणतीही आकडेवारी पालिकेने अद्याप एकत्रित केलेली नाही. दुसरीकडे घरे, दुकाने तुटली म्हणून बाधितांनी पालिकेकडे अर्ज-विनंत्या सुरू केल्या असून त्याची संख्या शेकडोंच्या घरात आहे.>‘१८ ऐवजी १५ मीटर रस्ता करा’भार्इंदर पूर्व परिसरातील इमारती या ग्रामपंचायत काळापासूनच्या आहेत. अस्तित्वात असलेल्या इमारतींचा विचार न करताच १९९७ मध्ये विकास आराखडा मंजूर केल्याने सध्या येथे १८ मीटर रस्ता रुंदीकरणासाठी सुरू असलेली कारवाई थांबवावी. महासभेत १५ मीटर रस्ता ठेवण्याचा प्रस्ताव आणावा, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक रोहिदास पाटील यांनी महापौर गीता जैन यांना केली आहे. तर, दुसरीकडे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी पाटील यांची मागणी फेटाळली आहे. आदल्या रात्री लाल पट्टे मारून जायचे व दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात फौजफाटा घेऊन इमारत पाडायची, अशी मोगलाई सुरू आहे, असा आरोप पाटील यांनी केला आहे.