शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

सांगा, आम्ही कसं जगायचं...?

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

अकरा महिन्यांचा पगार थकला : ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची विचारणा

गणेश शिंदे - कोल्हापूर -- सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाअंतर्गत (सीपीआर) उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षक वर्षभरापासून पगाराविना आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने त्यांना वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे वेतनाविना त्यांचे आर्थिक आरोग्य ‘बिघडले’आहे. वारंवार गाऱ्हाणे घालूनही दखल न घेतल्यामुळे ‘सांगा, आम्ही कसं जगायचं ? अशी विचारणा हे सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांकडे करीत आहेत.येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातंर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. सीपीआर प्रशासनांतर्गंत गडहिंग्लज, कोडोली या उपजिल्हा तसेच मलकापूर, गारगोटी, सोळांकूर, राधानगरी, चंदगड या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना १ एप्रिल २०१४पासून म्हणजेच ११ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. जिल्हा सुरक्षा मंडळाकडून ३० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गडहिंग्लज या उपजिल्हा रुग्णालयात नऊ सुरक्षा रक्षकांची नेमणूक आहे. थकीत पगारामुळे हे सुरक्षारक्षक काही दिवसांपूर्वी कोल्हापूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात गेले होते. पण, तेथील अधिकाऱ्यांनी शासनाकडून अनुदान आले नसल्याचे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना हात हलवत परतावे लागले होते. सुरक्षा रक्षकांना महिन्याला सरासरी दहा ते साडेदहा हजार रुपये वेतन मिळते.मध्यंतरी शासनाने ६ लाख ९२ हजार रुपये विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयास दिले होते. मात्र, हा निधी गारगोटी व मलकापूर या दोन ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आला. दरम्यान, याबाबत कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.२८ लाख ४१ हजार रुपयांचा प्रस्ताव...गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर, मलकापूर, गारगोटी, राधानगरी, सोळांकूर, चंदगड या ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१४ या काळातील प्रलंबित वेतनासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे २८ लाख ४१हजार रुपयांचा प्रस्ताव दिला होता.त्यावर आगामी अर्थसंकल्पात याची तरतूद केली जाईल, असे पत्र २ आॅक्टोबर २०१४ या कार्यालयाला पाठविल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकांचे बिघडले 'आरोग्य'रोजी-रोटीसाठी दिवस-रात्र ग्रामीण रुग्णालयांची आम्ही सुरक्षा करतो पण, शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार थांबला तर लगेच आकांड-तांडव सुरू होते. गेल्या अकरा महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याचे एका सुरक्षा रक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर 'लोकमत'ला सांगितले.१ कोटी ५९ लाख ४९ हजारांची मागणी... ग्रामीण रुग्णालयांमधील स्वच्छता, सुरक्षा रक्षक, धुलाई, वाहनचालक आदींसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे १ कोटी ५९ लाख ४९ हजार रुपयांची मागणी केली आहे. परंतू, अद्याप अनुदान आले नसल्याचे सांगण्यात आले.सुरक्षा रक्षकांना शासनाकडून अनुदान न मिळाल्याने त्यांना वेतन मिळालेले नाही. जिल्हाधिकारी, कोषागार कार्यालय व जिल्हा आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी याप्रश्नी बोलणे झाले आहे. या सुरक्षा रक्षकांना दहा मार्चपर्यंत वेतन मिळेल.- सुहास कदम, कामगार आयुक्त तथा अध्यक्ष जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कोल्हापूर.