शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सांगा, आम्ही कसं जगायचं...?

By admin | Updated: February 25, 2015 00:03 IST

अकरा महिन्यांचा पगार थकला : ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची विचारणा

गणेश शिंदे - कोल्हापूर -- सर्वसामान्य रुग्णांसाठी आधारवड ठरलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाअंतर्गत (सीपीआर) उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षक वर्षभरापासून पगाराविना आहेत. शासनाकडून अनुदान न मिळाल्याने त्यांना वेतन अदा केलेले नाही. त्यामुळे वेतनाविना त्यांचे आर्थिक आरोग्य ‘बिघडले’आहे. वारंवार गाऱ्हाणे घालूनही दखल न घेतल्यामुळे ‘सांगा, आम्ही कसं जगायचं ? अशी विचारणा हे सुरक्षा रक्षक अधिकाऱ्यांकडे करीत आहेत.येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातंर्गत उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरक्षा रक्षकांची भरती केली आहे. सीपीआर प्रशासनांतर्गंत गडहिंग्लज, कोडोली या उपजिल्हा तसेच मलकापूर, गारगोटी, सोळांकूर, राधानगरी, चंदगड या ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना १ एप्रिल २०१४पासून म्हणजेच ११ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. जिल्हा सुरक्षा मंडळाकडून ३० सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गडहिंग्लज या उपजिल्हा रुग्णालयात नऊ सुरक्षा रक्षकांची नेमणूक आहे. थकीत पगारामुळे हे सुरक्षारक्षक काही दिवसांपूर्वी कोल्हापूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयात गेले होते. पण, तेथील अधिकाऱ्यांनी शासनाकडून अनुदान आले नसल्याचे सांगून उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे सुरक्षा रक्षकांना हात हलवत परतावे लागले होते. सुरक्षा रक्षकांना महिन्याला सरासरी दहा ते साडेदहा हजार रुपये वेतन मिळते.मध्यंतरी शासनाने ६ लाख ९२ हजार रुपये विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयास दिले होते. मात्र, हा निधी गारगोटी व मलकापूर या दोन ग्रामीण रुग्णालयांना देण्यात आला. दरम्यान, याबाबत कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मोबाईल उचलला नाही.२८ लाख ४१ हजार रुपयांचा प्रस्ताव...गडहिंग्लज, कोडोली, गांधीनगर, मलकापूर, गारगोटी, राधानगरी, सोळांकूर, चंदगड या ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांच्या जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१४ या काळातील प्रलंबित वेतनासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे २८ लाख ४१हजार रुपयांचा प्रस्ताव दिला होता.त्यावर आगामी अर्थसंकल्पात याची तरतूद केली जाईल, असे पत्र २ आॅक्टोबर २०१४ या कार्यालयाला पाठविल्याचे सांगण्यात आले. सुरक्षा रक्षकांचे बिघडले 'आरोग्य'रोजी-रोटीसाठी दिवस-रात्र ग्रामीण रुग्णालयांची आम्ही सुरक्षा करतो पण, शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांचा एक महिन्याचा पगार थांबला तर लगेच आकांड-तांडव सुरू होते. गेल्या अकरा महिन्यांचे वेतन मिळाले नसल्याचे एका सुरक्षा रक्षकाने नाव न सांगण्याच्या अटीवर 'लोकमत'ला सांगितले.१ कोटी ५९ लाख ४९ हजारांची मागणी... ग्रामीण रुग्णालयांमधील स्वच्छता, सुरक्षा रक्षक, धुलाई, वाहनचालक आदींसाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने शासनाकडे १ कोटी ५९ लाख ४९ हजार रुपयांची मागणी केली आहे. परंतू, अद्याप अनुदान आले नसल्याचे सांगण्यात आले.सुरक्षा रक्षकांना शासनाकडून अनुदान न मिळाल्याने त्यांना वेतन मिळालेले नाही. जिल्हाधिकारी, कोषागार कार्यालय व जिल्हा आरोग्य उपसंचालक कार्यालयाशी याप्रश्नी बोलणे झाले आहे. या सुरक्षा रक्षकांना दहा मार्चपर्यंत वेतन मिळेल.- सुहास कदम, कामगार आयुक्त तथा अध्यक्ष जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कोल्हापूर.