शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार!

By admin | Updated: June 3, 2017 03:44 IST

शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या आंदोलनात किसान सभेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटू ही कामगार संघटना खांद्याला खांदा लावून उभे असतील, अशी माहिती माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.येचुरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी २ दिवस नाशिक ठप्प केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ६ महिन्यांचा वेळ मागत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटल्यानंतरही शेतमालाला हमीभाव नाही. उत्पादनाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. फक्त सांप्रदायिक मुद्दे पुढे करून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सद्यस्थितीत देशात दरवर्षी १.५ कोटी सुशिक्षित तरुण महाविद्यालयांतून बाहेर पडत असून, केवळ १.३ लाख रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार कानाडोळा करत असल्यानेच, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतील. शेतकरी संपामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीयांची परवड होत असली, तरी त्याग केल्याशिवाय क्रांती होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनी त्याग करण्यास तयार राहावे. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ होतात. मग शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.