शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

५ जूनला तहसीलदार कार्यालय बंद करणार!

By admin | Updated: June 3, 2017 03:44 IST

शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शेतकऱ्यांच्या संपावर येत्या दोन दिवसांत तोडगा काढला नाही, तर ५ जूनला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयांचा ताबा घेण्याचा इशारा अखिल भारतीय किसान सभेने दिला आहे. या आंदोलनात किसान सभेसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सीटू ही कामगार संघटना खांद्याला खांदा लावून उभे असतील, अशी माहिती माकपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सीताराम येचुरी यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.येचुरी म्हणाले की, शेतकऱ्यांनी वर्षभरापूर्वी कर्जमुक्ती, शेतीमालाला हमीभाव अशा विविध मागण्यांसाठी २ दिवस नाशिक ठप्प केले होते. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ६ महिन्यांचा वेळ मागत आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र, तब्बल एक वर्ष उलटल्यानंतरही शेतमालाला हमीभाव नाही. उत्पादनाच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी दिले होते, त्याची पूर्तता अद्याप केलेली नाही. फक्त सांप्रदायिक मुद्दे पुढे करून, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. दरवर्षी २ कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन सरकारने दिले होते. मात्र, सद्यस्थितीत देशात दरवर्षी १.५ कोटी सुशिक्षित तरुण महाविद्यालयांतून बाहेर पडत असून, केवळ १.३ लाख रोजगार निर्मिती होत आहे. त्यामुळे बेरोजगारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार कानाडोळा करत असल्यानेच, शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.किसान सभेचे केंद्रीय सहसचिव कॉ. अशोक ढवळे म्हणाले की, ‘कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकरी तहसीलदार कार्यालयाचा ताबा घेतील. शेतकरी संपामुळे शहरी भागातील मध्यमवर्गीयांची परवड होत असली, तरी त्याग केल्याशिवाय क्रांती होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसोबत सर्वसामान्यांनी त्याग करण्यास तयार राहावे. बड्या उद्योगपतींची कर्जे माफ होतात. मग शेतकऱ्यांवरच अन्याय का?’ असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.