शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक मुद्यावर वाया गेला प्रश्नोत्तराचा तास !

By admin | Updated: July 20, 2016 05:10 IST

नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या विषयावर सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरु करा, अशी मागणी विरोधकांची होती

अतुल कुलकर्णी,

मुंबई- नगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या विषयावर सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरु करा, अशी मागणी विरोधकांची होती. तर प्रश्नोत्तराचा तास बाजूला ठेवून लगेच चर्चा सुरु करा, असा आग्रह अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचा होता. त्याआधी अध्यक्षांच्या दालनात मॅरेथॉन बैठक पार पडली; पण तोडगा निघालाच नाही, शेवटी या वादात काहीही कामकाज न होता प्रश्नोत्तराचा तास मात्र वाया गेला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कामकाज पत्रिकेत कोणतेही कामकाज नव्हते. त्यामुळे सगळे सदस्य साडेबाराला घरी निघून गेले. त्याऐवजी याविषयावर चर्चा झाली असती तर राज्यात चांगला संदेश गेला असता, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत आणि सभागृहात व्यक्त केले. मात्र पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव होता. शोकप्रस्तावानंतर कोणतीही चर्चा होऊ नये, असे संकेत असल्याने काल चर्चा घेतली नाही. कामकाज काहीच नव्हते असे कसे म्हणता असे म्हणत अध्यक्षांनी आपली नाराजी व्यक्त केली.सभागृह सकाळी ११ वाजता सुरु झाले, तेव्हा कोपर्डीवरील चर्चा नेमकी कधी घ्यायची यावर जवळपास २० मिनीटे चर्चा झाली. प्रश्नोत्तराचा तास तहकूब करु नय,े असा आग्रह याआधीचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही कायम धरलेला होता ,असा दाखला अध्यक्षांनी दिला; मात्र अपवादात्मक स्थितीत हा तास रद्द करता येतो, असे सांगून वळसे पाटील यांनी अध्यक्ष असताना घेतलेल्या निर्णयाच्या विरुध्द मतप्रदर्शन केले. परिणामी अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटे तहकूब केले. त्यानंतरही तोडगा निघाला नाही; तेव्हा पुन्हा सभागृह १२ वाजेपर्यंत तहकुब केले गेले. परिणामी प्रश्नोत्तराचा तास कोणत्याही चर्चेविना वाया गेला.मुख्यमंत्र्यांनी कालच कोपर्डी प्रकरणी सविस्तर निवेदन केले होते. त्यामुळे चर्चेअंती मागणी तरी काय करायची, असा प्रश्न विरोधकांपुढे होता. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असे सांगत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामाच मागितला. मात्र; त्यास ना विरोधकांकडून प्रतिसाद मिळाला ना सत्ताधारी बाकावरुन विरोध झाला. मुख्यमंत्री सभागृहात भाषणे ऐकत असताना मंत्र्यांच्या बाकांवर वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट वगळता अनेकांची गैरहजेरीही चर्चेचा विषय बनली होती.>सभागृहात मंत्रीच अनुपस्थित!सभागृहात मंत्र्यांनी बसलेच पाहिजे, असा फतवा काढूनही मंत्र्यांची आणि सत्ताधारी बाकावरील सदस्यांची अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच रोडावलेली उपस्थिती पाहून संसदीय मंत्री बापट यांनी उद्या बुधवारी सगळ्या सदस्यांची व मंत्र्यांची बैठक विधानभवनात ठेवली आहे. ज्या हॉलमध्ये बैठक होणार आहे त्या हॉलचे दरवाजे सकाळी ९-४५ वाजता बंद होतील, त्यानंतर मंत्री असो की आमदार, कोणालाही आत सोडले जाणार नाही अशी ताकीद देणारे पत्रही राज पुरोहित आणि बापट यांनी सदस्यांना व मंत्र्यांना रवाना केले.