शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
2
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
3
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
4
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
5
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
6
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
7
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
8
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
9
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
10
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
11
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
12
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
13
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
14
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
15
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
16
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
17
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
18
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
19
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
20
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?

तंत्रज्ञान हे गरीबी संपविण्याचे औषध - विजयकुमार सारस्वत

By admin | Updated: June 30, 2016 16:32 IST

जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ३० -  जगाला आपल्या देशापासून अनेक अपेक्षा आहेत. परंतु तरीदेखील याचा फायदा समाजातील अखेरच्या स्तरापर्यंत हवा तसा अद्याप पोहोचलेला नाही. शासन, संशोधक देशातील तरुण यांनी यादृष्टीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गरिबी दूर होऊ शकेल., असे मत केंद्रीय नीति आयोगाचे सदस्य डॉ.विजयकुमार सारस्वत यांनी व्यक्त केले. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तिसऱ्या पदवीदान समारंभादरम्यान ते गुरुवारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या देशाने मोठी झेप घेतली आहे. परंतु आजदेखील समाजात विविध विषमता दिसून येतात. समाजातील विषमता नष्ट करायची असेल तर त्यावर विकास हाच एक पर्याय आहे व विकासासाठी तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त भर देणे आवश्यक आहे. पेटंट नोंदणीची संख्यादेखील वाढली पाहिजे, असे डॉ.सारस्वत म्हणाले. शासनाच्या आर्थिक व्यवहारात तंत्रज्ञानाचा वापर हवा...प्रशासकीय स्तरावर याचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक आहे. शासन तसेच प्रशासनातील महसूल, कर इत्यादी आर्थिक व्यवहार हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत. संशोधनाला शासनातर्फे पूर्ण सहकार्य लाभले पाहिजे. स्टार्टअप्सला सुरुवातीच्या काळात मदत केली पाहिजे. यासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्था, राष्ट्रीय प्रयोगशाळा येथे व्हॅल्यू क्रिएशन सेंटर उभारले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.सारस्वत यांनी केले.