शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

संविधानाचे भगवेकरण करण्याचा संघाचा प्रयत्न

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी

ठाणे : आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज आणि जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मातरम् हे गीत आणून संविधानाचे भगवेकरण ते करू पाहत आहेत. त्यांचे हे कृत्य संविधानविरोधी असल्याने त्यांना देशद्रोही ठरवावे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यावर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मारतम् हे नवे राष्ट्रगीत बनवावे तसेच भगव्या झेंड्याला राष्ट्रध्वज मानावे, अशी वादग्रस्त मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी देशविरोधी आहे. संविधानाने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून सामावून घेतले. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाहीत. त्यांनी कधी देशाचा ध्वज सन्मानाने फडकवला नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी सहभाग घेतला नाही. ते आज देशभक्ती शिकवत आहेत. त्यांना हा देश भगवा करायचा आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये करून या देशात विषाचे वातावरण पसरवायचे आहे. दुर्दैवाने अशा फुटीरतावादी विचारांवर चालणाऱ्यांची सत्ता या देशात आल्याची टीका त्यांनी केली. संघाची अशी वक्तव्ये संविधानविरोधी आहे. त्यामुळे जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तशी हिंमत या सरकारमध्ये आहे का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)