शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाचे भगवेकरण करण्याचा संघाचा प्रयत्न

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी

ठाणे : आपल्या संविधानात तिरंगा राष्ट्रध्वज आणि जन गण मन या दोन्हींना महत्त्व आहे. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न करीत आहे. तिरंगा राष्ट्रध्वजाऐवजी भगवा ध्वज आणि जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मातरम् हे गीत आणून संविधानाचे भगवेकरण ते करू पाहत आहेत. त्यांचे हे कृत्य संविधानविरोधी असल्याने त्यांना देशद्रोही ठरवावे, असे प्रतिपादन आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक भय्याजी जोशी यांनी राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताबाबत केलेल्या वक्तव्यावर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते. जन गण मन या राष्ट्रगीताऐवजी वंदे मारतम् हे नवे राष्ट्रगीत बनवावे तसेच भगव्या झेंड्याला राष्ट्रध्वज मानावे, अशी वादग्रस्त मागणी केली आहे. त्यांच्या या विधानाचा आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला. जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही मागणी देशविरोधी आहे. संविधानाने तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला. तसेच जन गण मन हे राष्ट्रगीत म्हणून सामावून घेतले. या दोन्ही गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाहीत. त्यांनी कधी देशाचा ध्वज सन्मानाने फडकवला नाही. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात कधी सहभाग घेतला नाही. ते आज देशभक्ती शिकवत आहेत. त्यांना हा देश भगवा करायचा आहे, अशी वादग्रस्त वक्तव्ये करून या देशात विषाचे वातावरण पसरवायचे आहे. दुर्दैवाने अशा फुटीरतावादी विचारांवर चालणाऱ्यांची सत्ता या देशात आल्याची टीका त्यांनी केली. संघाची अशी वक्तव्ये संविधानविरोधी आहे. त्यामुळे जोशी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. तशी हिंमत या सरकारमध्ये आहे का,असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (प्रतिनिधी)