शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

टीम देवेंद्रवर अपेक्षांचे ओङो!

By admin | Updated: October 30, 2014 00:17 IST

नव्या सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. खांदेपालट होऊन भाजपाप्रणीत सरकार सत्तेत येत आहे.

नव्या सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. खांदेपालट होऊन भाजपाप्रणीत सरकार सत्तेत येत आहे. लोकांनी मोठय़ा आशेने भाजपाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. सत्तेच्या सारीपाटातील राजकारणात जनतेला कोणताही रस नाही. त्यामुळे आता जनतेचे हित जपणारे व भ्रष्टाचार संपवणारे सरकार लोकांना हवे आहे. जनतेचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. विविध क्षेत्रंतील तज्ज्ञांना टीम देवेंद्रकडून काय अपेक्षा आहेत याचा टीम ‘लोकमत’ने घेतलेला धांडोळा!
 
घोटाळ्यांवर नियंत्रण आणा
सर्वसाधारणपणो निवडणूक जिंकल्यावर पहिल्या वर्षी उपकाराची फेड व पाचव्या वर्षी पुढील निवडणुकीसाठी आमिष म्हणून करसवलत देण्याची पद्धत झाली आहे. ती मोडीत काढावी. महागाई दर कमी केल्याचे नाटक सोडून जीवनावश्यक वस्तू दर कमी करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करावे. सर्वसामान्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर नियंत्रण आणून पारदर्शी व्यवस्था सुशासन घडवून आणावे. 
           - डॉ. विजया वाड (साहित्यिका)
 
गिरणी कामगारांना घरे द्या !
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. शांघाय दूर राहू द्या; पहिल्यांदा वाढत्या शहरीकरणादरम्यान रहिवाशांच्या गरजा कशा पूर्ण होतील, याकडे नव्या सरकारने लक्ष दिले पाहिजे. विकासाचे नेमके चित्र मांडले पाहिजे. केवळ गिरणी कामगार नाही तर सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्न आहे. तो नव्या सरकारने सोडविला पाहिजे. गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. तरुणांसाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. 
- दत्ता इस्वलकर  (गिरणी कामगार नेते)
 
आरोग्य सेवांना प्राधान्य द्यावे
राजीव गांधी जीवनदायी योजना अजून सक्षम करायला हवी. ग्रामीण भागांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत. सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांची संख्या वाढवली पाहिजे. कर्करोगावर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे. प्रत्येक जिल्हा पातळीवरच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध असावेत, अशा प्रकारे रुग्णालयांची आखणी 
करावी.
                   - डॉ. तात्याराव लहाने 
(अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय)
 
एकतर्फी निर्णय टाळावेत
सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच अपेक्षा आहेत. मात्र या सरकारने कुठलेही एकतर्फी निर्णय घेऊ नयेत आणि हे निर्णय कुठल्याही विभागांसाठी घातक ठरता कामा नयेत. केंद्रात असलेल्या सरकारकडून नुसतेच एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. तसे राज्यात होता कामा नये. म्हणूनच कामगार वर्गांशी संबंधित निर्णय नव्या सरकारने चर्चा करूनच घ्यावेत. जेणोकरून त्यामधून मार्ग निघेल आणि कुठलाही वाद राहणार नाही. 
- शरद राव 
(मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन - नेता)
 
भांडवलदारांचा 
दबाव झुगारा
बडे कॉर्पोरेट्स आणि विदेशी भांडवलशाही प्रतिनिधी मिळून सहकार क्षेत्रत शिरकाव करू पाहत आहेत. अधिकाधिक बँकांचे खासगीकरण करून सहकार क्षेत्र नष्ट करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे बडय़ा कॉर्पोरेट्स आणि विदेशी भांडवलदारांच्या प्रतिनिधींमार्फत एकत्रितपणो शासनावर दबाव टाकण्यात येईल. अशा वेळी दबावाला बळी न पडता सार्वजनिक क्षेत्रच्या हिताचे निर्णय घेण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे.
- विश्वास उट्टगी 
(बँक कर्मचारी नेते)
 
एसटीला वाचवण्याचे आव्हान 
नवीन सरकारकडून या वेळी अपेक्षा खूपच आहेत. एसटीतून लाखो प्रवासी प्रवास करतात आणि या एसटीचा पसाराही खूप मोठा आहे. अशा एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी. महत्त्वाचे म्हणजे प्रवासी सवलतीचे मूल्य एकाच खात्यापासून मिळावे, प्रवासी कर कमी करावा, अवैध वाहतूक थांबवावी आणि डिङोलवरचा सेल्स टॅक्स इतर राज्याप्रमाणो कमी करावा, अशी आमची अपेक्षा आहे. 
- शिवाजीराव चव्हाण (महाराष्ट्र एसटी कामगार संघटना - अध्यक्ष)