शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

टीम देवेंद्रवर अपेक्षांचे ओङो!

By admin | Updated: October 30, 2014 00:17 IST

नव्या सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. खांदेपालट होऊन भाजपाप्रणीत सरकार सत्तेत येत आहे.

नव्या सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर आला आहे. खांदेपालट होऊन भाजपाप्रणीत सरकार सत्तेत येत आहे. लोकांनी मोठय़ा आशेने भाजपाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून कौल दिला आहे. सत्तेच्या सारीपाटातील राजकारणात जनतेला कोणताही रस नाही. त्यामुळे आता जनतेचे हित जपणारे व भ्रष्टाचार संपवणारे सरकार लोकांना हवे आहे. जनतेचे अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. विविध क्षेत्रंतील तज्ज्ञांना टीम देवेंद्रकडून काय अपेक्षा आहेत याचा टीम ‘लोकमत’ने घेतलेला धांडोळा!
 
घोटाळ्यांवर नियंत्रण आणा
सर्वसाधारणपणो निवडणूक जिंकल्यावर पहिल्या वर्षी उपकाराची फेड व पाचव्या वर्षी पुढील निवडणुकीसाठी आमिष म्हणून करसवलत देण्याची पद्धत झाली आहे. ती मोडीत काढावी. महागाई दर कमी केल्याचे नाटक सोडून जीवनावश्यक वस्तू दर कमी करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करावे. सर्वसामान्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर नियंत्रण आणून पारदर्शी व्यवस्था सुशासन घडवून आणावे. 
           - डॉ. विजया वाड (साहित्यिका)
 
गिरणी कामगारांना घरे द्या !
केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. शांघाय दूर राहू द्या; पहिल्यांदा वाढत्या शहरीकरणादरम्यान रहिवाशांच्या गरजा कशा पूर्ण होतील, याकडे नव्या सरकारने लक्ष दिले पाहिजे. विकासाचे नेमके चित्र मांडले पाहिजे. केवळ गिरणी कामगार नाही तर सर्वसामान्यांच्या घरांचा प्रश्न आहे. तो नव्या सरकारने सोडविला पाहिजे. गरिबांच्या मुलांना मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. तरुणांसाठी रोजगार निर्मिती झाली पाहिजे. 
- दत्ता इस्वलकर  (गिरणी कामगार नेते)
 
आरोग्य सेवांना प्राधान्य द्यावे
राजीव गांधी जीवनदायी योजना अजून सक्षम करायला हवी. ग्रामीण भागांमध्ये प्राथमिक आरोग्य सुविधा पोहोचल्या पाहिजेत. सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांची संख्या वाढवली पाहिजे. कर्करोगावर उपचार करणारे स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे. प्रत्येक जिल्हा पातळीवरच्या प्रत्येक रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार उपलब्ध असावेत, अशा प्रकारे रुग्णालयांची आखणी 
करावी.
                   - डॉ. तात्याराव लहाने 
(अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय)
 
एकतर्फी निर्णय टाळावेत
सध्याच्या सरकारकडून अपेक्षाच अपेक्षा आहेत. मात्र या सरकारने कुठलेही एकतर्फी निर्णय घेऊ नयेत आणि हे निर्णय कुठल्याही विभागांसाठी घातक ठरता कामा नयेत. केंद्रात असलेल्या सरकारकडून नुसतेच एकतर्फी निर्णय घेतले जात आहेत. तसे राज्यात होता कामा नये. म्हणूनच कामगार वर्गांशी संबंधित निर्णय नव्या सरकारने चर्चा करूनच घ्यावेत. जेणोकरून त्यामधून मार्ग निघेल आणि कुठलाही वाद राहणार नाही. 
- शरद राव 
(मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियन - नेता)
 
भांडवलदारांचा 
दबाव झुगारा
बडे कॉर्पोरेट्स आणि विदेशी भांडवलशाही प्रतिनिधी मिळून सहकार क्षेत्रत शिरकाव करू पाहत आहेत. अधिकाधिक बँकांचे खासगीकरण करून सहकार क्षेत्र नष्ट करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. त्यामुळे बडय़ा कॉर्पोरेट्स आणि विदेशी भांडवलदारांच्या प्रतिनिधींमार्फत एकत्रितपणो शासनावर दबाव टाकण्यात येईल. अशा वेळी दबावाला बळी न पडता सार्वजनिक क्षेत्रच्या हिताचे निर्णय घेण्याचे आव्हान नव्या सरकारसमोर आहे.
- विश्वास उट्टगी 
(बँक कर्मचारी नेते)
 
एसटीला वाचवण्याचे आव्हान 
नवीन सरकारकडून या वेळी अपेक्षा खूपच आहेत. एसटीतून लाखो प्रवासी प्रवास करतात आणि या एसटीचा पसाराही खूप मोठा आहे. अशा एसटीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने मदत करावी. महत्त्वाचे म्हणजे प्रवासी सवलतीचे मूल्य एकाच खात्यापासून मिळावे, प्रवासी कर कमी करावा, अवैध वाहतूक थांबवावी आणि डिङोलवरचा सेल्स टॅक्स इतर राज्याप्रमाणो कमी करावा, अशी आमची अपेक्षा आहे. 
- शिवाजीराव चव्हाण (महाराष्ट्र एसटी कामगार संघटना - अध्यक्ष)