शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी शिक्षक दिल्लीला धडकणार, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:29 IST

देशभरातील शिक्षकांच्या आणि शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी, केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची मागणी करत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने, सोमवारी आझाद मैदानात धरणे धरले.

मुंबई : देशभरातील शिक्षकांच्या आणि शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी, केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण आयोगाची स्थापना करण्याची मागणी करत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने, सोमवारी आझाद मैदानात धरणे धरले. आयोग स्थापनेच्या मागणीसाठी संघाची शिखर संघटना असलेल्या अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने, ५ आॅक्टोबरला दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. त्यात राज्यातील हजारो प्राथमिक शिक्षक सामील होतील, अशी माहिती केंद्रीय संघाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा सुलभा दोंदे यांनी दिली.दोंदे म्हणाल्या की, सर्व राज्यांतील प्रतिनिधींची संयुक्त बैठक ३० डिसेंबर २०१६ रोजी झाली होती. त्यात केंद्रीय पातळीवर आंदोलनाची घोषणा करण्यात आली. त्या आधी सरकारला इशारा देण्यासाठी मार्च २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मनुष्यबळ विकासमंत्री, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदने देण्यात आली. त्यानंतर, संपूर्ण देशात एकाच दिवशी २५ एप्रिलला तालुकानिहाय आणि ५ आॅगस्टला जिल्हानिहाय धरणे आंदोलन करण्यात आले. तरीही केंद्र शासनाला जाग आलेली नाही.या आंदोलनाच्या निमित्ताने राष्ट्रीय शिक्षण आयोगासह जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी शिक्षण संघाने केली आहे, तसेच सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून, सातवा वेतन आयोग १ जानेवारी, २०१६ पासून लागू करण्याचा निर्णय लवकर घोषित करण्याचे आवाहन शिक्षक संघाने केले आहे.>६ आॅक्टोबरला ठरविणार पुढील दिशाराज्यभरातील जिल्हाधिकाºयांमार्फत शिक्षकांनी पंतप्रधान मोदी यांना मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास ५ आॅक्टोबरला दिल्लीला धरणे धरण्यात येईल. त्यानंतर, ६ आॅक्टोबरला दिल्लीत राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचे संघाने स्पष्ट केले.