शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

शिक्षकांनीच घेतला टीईटी परीक्षेचा धसका!

By admin | Updated: November 3, 2014 04:05 IST

राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी या परीक्षेत सुमारे ९५ टक्के उमेदवार नापास झाल्याने यंदाच्या परीक्षेचा शिक्षकांनी धसका घेतला आहे. गेल्या वर्षी सहा लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच या परीक्षेसाठी अर्ज केला असल्याने शिक्षकांनीच या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचा कार्यक्रम आॅक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानुसार डी.एड., बी.एड.धारक शिक्षकांना २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार होते. यंदा या परीक्षेसाठी केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच अर्ज केले असून त्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना १ ते १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी टीईटी परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांपैकी पहिली ते पाचवीसाठीचे ४.४३ टक्के आणि सहावी ते ८ वीसाठीचे केवळ ५.९५ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. तर या परीक्षेत ९५ टक्के शिक्षक नापास झाल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले होते. या परीक्षेनंतर डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक शिक्षक परीक्षेला बसणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या परीक्षेच्या निकालाचा शिक्षकांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत अधिकाधिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत, यासाठी परीक्षेत विशेष सूट देण्यात आली होती.तरीही डी.एड., बी.एड. झालेल्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ६० टक्के गुणही मिळविता आले नव्हते. यामुळे यंदाच्या परीक्षेकडे लाखो शिक्षकांनी पाठ फिरवल्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)