शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनीच घेतला टीईटी परीक्षेचा धसका!

By admin | Updated: November 3, 2014 04:05 IST

राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते

मुंबई : राज्यातील शाळांमध्ये गुणात्मक व दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून गेल्या वर्षीपासून टीईटी ही शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येते. गतवर्षी या परीक्षेत सुमारे ९५ टक्के उमेदवार नापास झाल्याने यंदाच्या परीक्षेचा शिक्षकांनी धसका घेतला आहे. गेल्या वर्षी सहा लाख २१ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केला होता. त्या तुलनेत यंदा केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच या परीक्षेसाठी अर्ज केला असल्याने शिक्षकांनीच या परीक्षेकडे पाठ फिरवली आहे, असे दिसते़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेचा कार्यक्रम आॅक्टोबरमध्ये जाहीर केला होता. त्यानुसार डी.एड., बी.एड.धारक शिक्षकांना २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाइन अर्ज सादर करता येणार होते. यंदा या परीक्षेसाठी केवळ ३ लाख ८५ हजार शिक्षकांनीच अर्ज केले असून त्यांची परीक्षा १४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. तर अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना १ ते १० नोव्हेंबरपर्यंत मुदत दिल्याची माहिती परिषदेच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या वर्षी टीईटी परीक्षा १५ डिसेंबर २०१३ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेला बसलेल्या शिक्षकांपैकी पहिली ते पाचवीसाठीचे ४.४३ टक्के आणि सहावी ते ८ वीसाठीचे केवळ ५.९५ टक्के शिक्षक उत्तीर्ण झाले होते. तर या परीक्षेत ९५ टक्के शिक्षक नापास झाल्याने शिक्षकांच्या गुणवत्तेचे वाभाडे निघाले होते. या परीक्षेनंतर डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेला राज्यभरातून सुमारे पाच लाखांहून अधिक शिक्षक परीक्षेला बसणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या परीक्षेच्या निकालाचा शिक्षकांनी धसका घेतल्याचे दिसत आहे.गेल्या वर्षी झालेल्या टीईटी परीक्षेत अधिकाधिक उमेदवार उत्तीर्ण व्हावेत, यासाठी परीक्षेत विशेष सूट देण्यात आली होती.तरीही डी.एड., बी.एड. झालेल्या ९५ टक्क्यांहून अधिक शिक्षकांना ६० टक्के गुणही मिळविता आले नव्हते. यामुळे यंदाच्या परीक्षेकडे लाखो शिक्षकांनी पाठ फिरवल्याचा अंदाज शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. (प्रतिनिधी)