शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

बदली रोखण्यासाठी शिक्षिकेचे नाट्य!

By admin | Updated: August 2, 2016 02:18 IST

वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता. मात्र आपली बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने हा बनाव केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार वाकोला पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.वाकोल्याच्या उर्दू शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही. या शाळेतील एका शिक्षिकेने बदली रोखण्यासाठी हे सर्व नाट्य घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला शाळेतून संबंधित शिक्षिकेची बदली बीकेसी परिसरात केली जाणार होती. मात्र हे तिला मंजूर नसल्याने ती या शाळेतील काही मुलींच्या घरी गेली आणि तिने या दोन शिक्षकांविरुद्ध या मुलींना आरोप करण्यास सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने पोलिसांची दिशाभूल करीत दोन शिक्षकांवर खोटा आरोप केल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकाही पालकाची अद्याप तक्रार न आल्याने आम्ही या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहत असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.।आरोपात काही तथ्य नाहीहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही.