शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
7
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
8
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
9
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
10
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
11
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
12
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
13
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
15
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
16
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
17
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
18
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
19
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
20
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...

बदली रोखण्यासाठी शिक्षिकेचे नाट्य!

By admin | Updated: August 2, 2016 02:18 IST

वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- वाकोल्यात एका उर्दू शाळेमध्ये १६ शाळकरी मुलींचा विनयभंग शिक्षकांनी केल्याचा आरोप स्थानिक नगरसेविकेने केला होता. मात्र आपली बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने हा बनाव केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानुसार वाकोला पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.वाकोल्याच्या उर्दू शाळेत विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याच्या वृत्तामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही. या शाळेतील एका शिक्षिकेने बदली रोखण्यासाठी हे सर्व नाट्य घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकोला शाळेतून संबंधित शिक्षिकेची बदली बीकेसी परिसरात केली जाणार होती. मात्र हे तिला मंजूर नसल्याने ती या शाळेतील काही मुलींच्या घरी गेली आणि तिने या दोन शिक्षकांविरुद्ध या मुलींना आरोप करण्यास सांगितले. त्यामुळे या शिक्षिकेने पोलिसांची दिशाभूल करीत दोन शिक्षकांवर खोटा आरोप केल्याचेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. एकाही पालकाची अद्याप तक्रार न आल्याने आम्ही या प्रकरणातील सत्यता पडताळून पाहत असल्याचे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महादेव व्हावळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.।आरोपात काही तथ्य नाहीहे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत सावधानता बाळगत सुरू केला. मात्र या आरोपात काही तथ्य नसून स्वत:ची बदली रोखण्यासाठी एका शिक्षिकेने केलेला हा बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी अद्याप एकाही पालकाने तक्रार केलेली नाही.