शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

शिक्षिकेच्या पतीची विद्यार्थ्यांना मारहाण

By admin | Updated: March 3, 2017 04:11 IST

सागाव येथील जयभारत इंग्लिश शाळेतील इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते

डोंबिवली : सागाव येथील जयभारत इंग्लिश शाळेतील इयत्ता आठवीच्या दोन विद्यार्थ्यांनी शिक्षिकेविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याबाबत, शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. व्यवस्थापनाकडून कारवाई होणे अपेक्षित असताना शिक्षिकेने पतीकरवी त्या विद्यार्थ्यांना एका ठिकाणी बोलवत अन्य दोन व्यक्तींच्या मदतीने मारहाण केली. तसेच त्यांना धमकावले. याप्रकरणी शाळा व्यवस्थापनाने शिक्षिकेविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप याप्रकरणाची गंभीर दखल घेतली नसल्याने शिक्षिकेविरोधात शाळा व्यवस्थापनाने निलंबनाची कारवाई केली आहे. चौकशीत सत्य उघड होत नाही, तोपर्यंत शिक्षिकेचे निलंबन कायम राहणार आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने तक्रार अर्ज मागे घ्यावा, यासाठी भाजपा महिला आघाडीतर्फे दबाव टाकला जात आहे, असा आरोप शाळा व्यवस्थापनाने केला आहे.शिक्षिका रोहिणी शर्मा यांच्याविषयी दोन विद्यार्थ्यांनी भिंतीवर अपशब्द लिहिले होते. हा प्रकार शर्मा यांनी मुख्याध्यापिका ज्योत्स्ना अय्यर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्याची दखलही अय्यर यांनी घेतली. शिक्षिकेचा दोन मुलांवर संशय होता. मात्र, त्याच मुलांनी हे प्रकरण केले आहे, याची शहानिशा केल्याशिवाय मुलांना शिक्षा कशी देणार? त्यामुळे संशयित मुलांच्या पालकांना मुख्याध्यापिकेने शाळेत बोलावून घेत घडलेला प्रकार सांगितला. मात्र, मुख्याध्यापिकेकडून न्याय मिळणार नाही, असा समज करून घेत शिक्षिकेने त्यांच्या पतीकरवी दोन जणांच्या मध्यस्थीने दोन मुलांना एका इमारतीत बोलावून घेतले. त्यांना मारहाण करत दमही भरला. हा प्रकार पालकांनी मुख्याध्यापिकेच्या कानांवर घातला. यामुळे अय्यर यांना धक्काच बसला. मुख्याध्यापिका अय्यर व शाळेचे विश्वस्त के. शिवा अय्यर यांनी मुलांना मारहाण करणाऱ्या व्यक्तींची नावे शिक्षिकेला विचारली. मात्र, तिने नावे सांगितली नाहीत. त्यावर, विश्वस्त व अय्यर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात २१ फेब्रुवारीला तक्रार अर्ज दिला. मात्र, अद्याप पोलिसांनी तिच्याविरोधात कारवाई केलेली नाही. याप्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत व्यवस्थापनाने शिक्षिकेस निलंबित केले आहे. विद्यार्थ्याचे वडील मोहन राम यांनी सांगितले की, माझा मुलगा सुरज राम व त्याचा वर्गमित्र यांच्याकडून चूक झाली. त्यांना शाळेने शिक्षा करण्याऐवजी अशी गुंडाकरवी शिक्षा करणे कितपत योग्य आहे. मुलांनी या प्रकरणाचा मानसिक धसका घेतला आहे. विद्यार्थी सुरज याने सांगितले की, त्याला एका बारमध्ये दोन जणांनी बोलावून घेतले. त्याच्या खिशातील २०० रुपये घेऊन त्याला मारहाण केली. माफी माग आणि आणखी पैसे घेऊन ये, असे धमकावले. पहिल्या दिवशी दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत एका ठिकाणी कोंडून ठेवले होते. मारहाणही केली. दरम्यान, मुख्याध्यापिका व विश्वस्त अय्यर म्हणाले की, याप्रकरणी पोलीस चौकशी करीत नाहीत. तसेच तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी भाजपाच्या महिला आघाडीकडून दबाव आणला जात आहे. (प्रतिनिधी)>शिक्षिकेच्या हातून चूक झालीयाप्रकरणी भाजपा महिला आघाडीच्या सुहासिनी राणे म्हणाल्या की, मुलांना शाळेबाहेर मारहाण झाली आहे. त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. मुलांचीही चूक आहे. शिक्षिकेच्या हातून चूक झाली आहे, हे शिक्षिकाही मान्य करीत आहे.>आरोप चुकीचा स्थानिक भाजपा नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनी सांगितले की, हे प्रकरण माझ्या प्रभागात घडले होते. त्यामुळे आम्ही ते मिटवण्यासाठी गेले होते. दबाव टाकल्याचा आरोप चुकीचा आहे. >योग्य चौकशी करणारमानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन काब्दुले म्हणाले की, तक्रार अर्ज आलेला आहे. योग्य ती चौकशी केली जाईल.