शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
2
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
4
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
5
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
6
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
7
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
8
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधा मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
9
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
10
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
13
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
16
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
17
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
18
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
19
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
20
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...

शिक्षक आंतरजिल्हा बदली धोरण मंगळवारी ठरणार

By admin | Updated: March 13, 2017 03:48 IST

राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे.

औरंगाबाद : राज्यातील २५ ते ३० हजार आंतरजिल्हाबदलीग्रस्त शिक्षकांचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून यासंदर्भात धोरण ठरविण्यासाठी ग्रामविकास सचिवांनी मंगळवारी मुंबईत बैठक बोलाविली आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न ‘लोकमत’ने लावून धरला होता. यासंदर्भात शिक्षक सहकार संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर धोरण निश्चितीसंदर्भात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. सध्या आंतरजिल्हा बदलीमध्ये आपसी बदलीसाठी जात संवर्गाची अट मोठी अडचण ठरत आहे. संवर्ग न मिळालेले हजारो प्रस्ताव अडकून पडले आहेत. या आंतरजिल्हाबदलीग्रस्तांमध्ये राज्यभरात पती-पत्नी एकत्रीकरणाचे पाच हजार प्रस्ताव प्रतीक्षेत आहेत. याशिवाय अपंग, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता, अट शिथील, एकतर्फी असे अनेक प्रस्ताव निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. आदिवासी भागात बदलीच्या प्रतीक्षेत असलेले शिक्षकही मोठ्या संख्येने आहेत. या सर्वांच्या नजरा या बैठकीकडे असून त्यातून निश्चितच सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)