शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

शिक्षक कुटुंबे आंदोलनाच्या पवित्र्यात

By admin | Updated: October 19, 2015 02:52 IST

आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

औरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तोपर्यंत निर्णय न घेतल्यास आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेतील शिक्षक १ डिसेंबरपासून कुटुंबीयांसह मुंबईत बेमुदत उपोषण करणार आहेत. शिक्षक आंतरजिल्हा बदली सहकार कृती समितीच्या शिष्टमंडळाने अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यपाल, ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते यांनाही निवेदन दिले. आंतरजिल्हा बदल्या न झाल्याने १० ते १५ वर्षांपासून राज्यातील जवळपास १२ हजार शिक्षकांपैकी काही आई-वडिलांपासून, तर कोणी पत्नी-मुलांपासून दूर आहेत. प्रत्येक कुटुंबाचे वेगळे दु:ख आहे. विस्कळीत कुटुंबांची व्यथा घेऊन १२ मे रोजी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. २८ जुलैला मुंबईतील आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणही केले. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. ५ सप्टेंबरला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पुन्हा मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. मात्र, त्याचाही उपयोग झाला नसल्याचे समितीचे राज्य अध्यक्ष अमर शिंदे, कार्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड आणि सचिव हनुमंत खुणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.(प्रतिनिधी)>राज्याचे रोस्टर एकच कराजिल्हानिहाय असलेले रोस्टर राज्यस्तरावर एकच करा. आंतरजिल्हा बदलीसाठी समान जात संवर्गाची अट रद्द करून उमेदवार ते उमेदवार करा, पती-पत्नी एकत्रीकरण प्रस्ताव विनाअट, विनाविलंब निकाली काढा, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संतोष पिट्टलवाड यांनी सांगितले. >बीड जिल्ह्यातील शिक्षक यवतमाळमध्ये कार्यरत आहेत. वडिलांना ते एकुलते एक. वडिलांच्या शरीरात अपेक्षित प्लेटलेट तयार होत नसल्याने दर १५ दिवसांनी रक्त तपासणी करावी लागते. त्याचा अहवाल औरंगाबादला द्यावा लागतो. त्यामुळे या शिक्षकाला दर १५ दिवसांनी यवतमाळवरून येऊन कसरत करावी लागते. वडिलांना त्यांची धावपळ पाहवत नाही. ते मुलाला म्हटले, तुझी ही धावपळ पाहवत नाही. नाहीतरी वय झाले आहे. मरू दे असेच मला.