शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

मुलांना जीवनाचे ‘पॅकेज’ शिकवावे

By admin | Updated: April 15, 2015 00:52 IST

पाल्याने मोठे झाल्यावर इंजिनिअर, डॉक्टर व्हावे. खूप मोठे पॅकेज मिळते, बंगला, गाडी या गोष्टी मिळतात, हे संस्कार मुलाच्या मनावर पालकांकडूनच नकळतपणे बिंबविले जातात.

पुणे : पाल्याने मोठे झाल्यावर इंजिनिअर, डॉक्टर व्हावे. खूप मोठे पॅकेज मिळते, बंगला, गाडी या गोष्टी मिळतात, हे संस्कार मुलाच्या मनावर पालकांकडूनच नकळतपणे बिंबविले जातात. आज समाजात शिक्षणाकडे ‘पॅकेज’ म्हणून पाहण्याची मानसिकता तयार झाली आहे. या पॅकेजपेक्षा जीवनाचे ‘पॅकेज’ कसे असले पाहिजे, याचे संस्काररूपी बाळकडू पालकांकडून मुलांना दिले गेले पाहिजे, असा मूलमंत्र लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी मंगळवारी पालकांना दिला. आदित्य प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘लक्ष्मी-वासुदेव’ स्त्री-शक्ती गौरव पुरस्कार वितरणाप्रसंगी त्या बोलत होत्या. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना ‘कलाभूषण’, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना ‘समाजभूषण’ तर उषामावशी कुलकर्णी यांना ‘अर्थभूषण’ व ज्येष्ठ शास्त्रज्ञ रोहिणी गोडबोले यांना ‘विज्ञानभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. २५ हजार रुपये, सरस्वतीचे सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी ज्येष्ठ संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व कार्यकारी विश्वस्त अपर्णा अभ्यंकर उपस्थित होते.हा मातृशक्तीचा केवळ विजय नव्हे, तर गौरव असल्याचे सांगून महाजन पुढे म्हणाल्या, ‘‘कोणत्याही संकटाला भिडण्याची ताकद ही स्त्रीमध्ये असते. बायको गेल्यानंतर आता मी एकटे कसे जगणार? घर कोण सांभाळणार? ही गोष्ट नवऱ्याला सतावते; पण बाईचा नवरा तिशीमध्ये गेल्यानंतरही पोटातल्या अर्भकाला एकटी जिद्दीने ती मोठ करते. याला म्हणतात मातृशक्ती. मुलावर योग्य प्रकारे संस्कार करण्याचे काम हे आईचेच असते. त्यामुळे मुलाला तू मोठेपणी कोण होणार? हे जेव्हा विचारले जाते, तेव्हा आईचे उत्तर खूप महत्त्वपूर्ण ठरते. शिक्षणाच्या पँकेजपेक्षा जीवनाचे पॅकेज काय असावे, ते मुलांना शिकविले पाहिजे.’’सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, ‘‘हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल हा पुरस्कार मिळाला असला, तरी माझ्यातील स्त्रीशक्तीचा केलेला सन्मान मला जास्त मोलाचा वाटतो. स्त्री म्हणजे दुर्गा नव्हे, तर मृदू, कोमल, त्यागी ही तिच्या शक्तीचीच रूपे आहेत. संगीत आणि नृत्यातील आशय समृद्ध करण्यात स्त्रीचा मोठा वाटा आहे.’’सिंधूताई सपकाळ यांनी आईची महती खूप मोठी असून, वडील हे रानातला दिवा असतील तर आई त्या दिव्यातील अखंडपणे प्रज्वलित होणारी ज्योत असल्याची भावना व्यक्त केली. उषामावशी आणि रोहिणी गोडबोले, डॉ. शंकर अभ्यंकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अपर्णा अभ्यंकर यांनी स्वागत केले. पुरस्कार वितरण समारंभापूर्वी ‘मातृवंदना’ हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर झाला. (प्रतिनिधी)जगात आज प्रत्येक राष्ट्रामध्ये मंदिरे आहेत; पण भारतच असा देश आहे, जिथे पृथ्वीला माता संबोधले जाते. म्हणून जगभरातल्या लोकांना भारताबद्दल विशेष अभिमान वाटतो. संतांचे तत्त्वज्ञान हा आपल्या जगण्याचा पाया आहे; त्यामुळे संत विद्यापीठ व्हावे ही राष्ट्राची गरज आहे - सुमित्रा महाजन, लोकसभा सभापती