शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत विजेवरही धावणार टॅक्सी-रिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 03:21 IST

मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात विजेवरील रिक्षा व टॅक्सी चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तब्बल २० वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई, पुण्यासह उर्वरित राज्यात विजेवरील रिक्षा व टॅक्सी चालविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे तब्बल २० वर्षांपासून बंदी असलेले विजेवरील आॅटोरिक्षा-टॅक्सी परवाने देण्याचे सरकारने ठरविले आहे. एका अध्यादेशाद्वारे ही माहिती सर्व प्रादेशिक परिवहन विभागांना कळविण्यात आली आहे. या निर्णयामुळे मुंबई महानगर क्षेत्रात नवीन परवान्यांसह इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा आणि काळी-पिवळी टॅक्सी लवकरच धावताना दिसू शकणार आहेत.प्रदूषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी विजेवर चालणाऱ्या आॅटोरिक्षेसह काळी-पिवळी टॅक्सीतून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विजेवर चालणाऱ्या रिक्षांना मीटर बसवल्याशिवाय परवाने देऊ नयेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्राच्या नियमांनुसार, १९९७ पासून इलेक्ट्रिक आॅटोरिक्षा-टॅक्सी परवान्याला बंदी घालण्यात आली होती. सद्यस्थितीत मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे २.५ लाख रिक्षा आणि ५० हजार टॅक्सी सीएनजी आणि एलपीजीवर धावत आहेत. सरकारच्या नवीन अध्यादेशामुळे अ‍ॅप बेस टॅक्सीदेखील विजेवर धावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवीन परवान्यांसाठी अटी, शर्ती योग्य लायसन्स, टॅक्सी चालविण्याचा बॅच कॅब आवश्यक पोलीस विभागाचा चारित्र्य पडताळणी दाखला आवश्यकअर्जदाराकडे आधीचा परवाना नसल्याचे प्रतिज्ञापत्र आॅटोरिक्षा-टॅक्सीमध्ये जीपीआरएस, आरएफआयडी टॅग बंधनकारक