शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफियांचे लक्ष्य १४ गावे

By admin | Updated: April 27, 2016 03:06 IST

महापालिकेमधून वगळण्यात आलेल्या १४ गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ लागले आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई-महापालिकेमधून वगळण्यात आलेल्या १४ गाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊ लागले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणाच नसल्याने वन विभागाच्या जमिनीवर भंगार गोडाऊनसह अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस शासकीय यंत्रणाच नसल्याने दिवसेंदिवस या परिसरातील स्थिती गंभीर होऊ लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेमधून शिळफाटा परिसरातील १४ गावे वगळण्यात आली आहेत. ही गावे कोणत्या महापालिकेमध्ये वर्ग करायची, याविषयी चर्चा सुरू आहे. नवी मुंबई, ठाणे की कल्याण पालिकेत त्यांचा समावेश करायचा, हे अद्याप निश्चित झालेले नाही. झपाट्याने शहरीकरण झालेल्या या विभागातील नागरी सुविधांसाठी ठोस यंत्रणा नाही. शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचा गैरफायदा भूमाफिया घेऊ लागले आहेत. १० वर्षांमध्ये या परिसरामध्ये प्रचंड अतिक्रमण झाले आहे. शिळफाटा ते तळोजा रोडच्या बाजूला भंगारची गोडाऊन उभारण्यात आली आहेत. याशिवाय इतरही व्यवसाय सुरू झाले आहेत. यामधील बहुतांश अनधिकृत आहेत. वन विभागाच्या जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. पूर्वी फक्त व्यावसायिक अतिक्रमण झाले होते. आता झोपड्या व इमारतीही उभ्या राहू लागल्या आहेत. अतिक्रमण रोखायचे कोणी व कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. येथे अवैध व्यवसाय करणारांचे प्रमाणही वाढले आहे. हॉटेल, लॉजची संख्या झपाट्याने वाढत आहे. डोंगरावरही झोपड्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे. अशीच स्थिती राहिली तर धारावीपेक्षा मोठी झोपडपट्टी व अनधिकृत साम्राज्य या परिसरात उभे राहील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चौदा गावांच्या सीमेवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेमधील अडवली भुतावली गावच्या परिसरामध्ये ३५५ हेक्टर वनजमीन आहे. यामधील काही जमीन मोठ्या व्यावसायिकांनी खरेदी केली असून, उर्वरित जमिनीवर झोपड्यांचे बांधकाम सुरू झाले आहे. १४ गावांच्या परिसरातील बोरीवली गावच्या हद्दीमध्येच तब्बल ५१३ हेक्टर वनजमीन आहे. परंतु या जमिनीचे रक्षण करण्यासाठीही कोणतीच यंत्रणा नाही. सद्य:स्थितीमध्ये ठाणे, नवी मुंबईमधील अनधिकृत बांधकामांवर वेगाने कारवाई सुरू झाली आहे. अनेक भूमाफियांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे येथे अतिक्रमण करणारांचे धाबे दणाणले असून, महापालिकेच्या कार्यक्षेत्राबाहेर अतिक्रमण करण्यास प्राधान्य मिळू लागले आहे. भविष्यात शिळफाटा परिसर हा ठाणे, नवी मुंबई विभागातील सर्वात महत्त्वाचा विभाग असणार आहे. याच परिसरात सद्य:स्थितीमध्ये विकासासाठी जमीन उपलब्ध आहे. परंतु शासनाने वेळेत अतिक्रमण थांबविले नाही तर भविष्यात त्यांचे दुष्परिणाम आजूबाजूच्या महापालिकांनाही भोगावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याविषयी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती संकलित करून न्यायालयात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे.