शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
7
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
8
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
9
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
10
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
11
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
12
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
13
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
14
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
15
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
16
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
17
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
18
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
19
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल

तारापूरचे बंद केलेले ३ मोठे उद्योग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 02:48 IST

अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली

पंकज राऊत,

बोईसर- पर्यावरणासंदर्भातील नियम, अटी व बंधने पायदळी तुडवून प्रदूषण केल्यामुळे बंद करण्यात आलेल्या तीन बड्या कारखान्यांकडून बँक गॅरंटी घेऊन ते पुन्हा सुरू करण्यात आल्याने नागरिकांत नाराजी पसरली आहे. या कारखान्यांचा वीज आणि पाणीपुरवठा तातडीने सुरु करण्यात आला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवडयांत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्या कारखान्यांचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरणासंदर्भात अटी व बँक गॅरंटी घेऊन कारवाई मागे घेण्यांत आली असून तीन कारखान्यांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही पूर्ववत सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भुमिपूत्रांनी केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील बॉम्बे रेयॉन, मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्स या तीन नामांकित उद्योगावर बंदची कारवाई करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी देवून उद्योगांचा पाणी व वीज पुरवठाही खंडित करण्याचे पत्रही एमआयडीसी व महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते मात्र या दोन्ही विभागाकडून पाणी व वीज पुरवठा खंडीत करण्यास टाळाटाळ करण्यात येत होती.विशेष गंभिर बाब म्हणजे एका बाजुला म.प्र.नि. मंडळ पाणी पूरवठा खंडीत करण्याचे पत्र एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता नंदकुमार करवा यांना पाठविल्यानंतर म.प्र.नि. मंडळाच्या तारापूर एक या विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे यांनी करवा यांना मोबाईलवर प्रादेशिक अधिकारी ठाणे यांनी सांगितल्या प्रमाणे बाँम्बे रेयॉन व रेसोनन्स या उद्योगांचा पणी पूरवठा खंडित करू नका असा संदेश पाठविला होता तर या संदर्भात शिवसेनेचे धोडी व संखे यांनी संबधित अधिकाऱ्यांना कारवाई संदर्भात जाब विचारून कारवाईची मागणी केली होती. अखेर २४ आॅक्टोबरला तिन्ही उद्योगांचा पाणी तर २५ आॅक्टोबरला वीज पुरवठा खंडित केला. दोन्ही कारवाईसाठी एमआयडीसी च्या पाणी पुरवठा विभागाच्या आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण अवलंबिले होते. मात्र २७ आॅक्टोबर बाँम्बे रेयॉनला पुन्हा उद्योग सुरू करण्याचे पत्र म.प्र.नि. मंडळाने दिल्यानंतर २८ आॅक्टोबरला सकाळी त्वरीत पाणी पुरवठा सुरू करण्यांत आला.मुद्रा लाईफ स्टाईल व रेसोनन्सचा पाणीपुरवठा म.प्र.नि. कडून पत्र मिळाले त्याच दिवशी म्हणजे २८ आॅक्टोबरला पाणी पुरवठा सुरू करण्याची तत्परता पाणी पुरवठा विभागाने दाखविली. तर रेसोनन्स व मुद्रा लाईफ स्टाईल वीज पुरवठा तत्परतेने सुरू करण्यात आला मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे बाँम्बे रेयॉन रीकनेक्शन चार्जेस भरू न शकल्याने तिचा वीज पुरवठा सुरू झाला नसला तरी तोही लवकरच सुरू होईल.>स्थानिक म्हणतात कारवाईचा केला फार्सहे तीन मोठे कारखाने आॅक्टोबरच्या शेवटास प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंद करून त्यांंचा वीज व पाणी पुरवठा खंडित केला होता मात्र अवघ्या काही दिवसातच पर्यावरण संवर्धनाच्या अटी लादून बँक गॅरंटी घेण्यात आली त्याबदल्यात कारवाई मागे घेण्यांत आली असून तिघांचा पाणी पुरवठा तर दोघांचा वीज पुरवठाही सुरू करण्यात आला आहे तर ही कारवाई म्हणजे दिखाऊ व एक फार्स असल्याचा आरोप भूमिपुत्रांनी केला आहे.