शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तानसा धरणक्षेत्रात हंडा, कळशी अन टिकाव, कुदळसुद्धा...!

By admin | Updated: April 29, 2016 04:02 IST

तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात नव्याने येणार्या धरण प्रकल्पांना पुनर्वसनाच्या प्रश्नावरून विरोध होत असतानाच ब्रिटीश राजवटीत मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तानसा परिसरातील सावरदेव, उंबरपाडा, नांदगाव, हेदूचापाडा, वैगेरे अनेक गावातील ग्रामस्थ धरणातील पाणी साठ्याच्या मागील भागात नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्यावर आपली गरज भागवत असून आज खोदलेला खड्डा उद्या कोरडा पडत असल्याने तो पुन्हा नव्याने खोदण्याचा उद्योग दररोज करावा लागत आहे. ऐरवी पाण्यासाठी हंडा, कळशी, घेऊन जाणाऱ्या महिलांना आता जोडीला टिकाव किंवा कुदळ बरोबर घेऊन भटकंती करावी लागत आहे.या परिसरातील सावरदेव गावातील एकमेव २० ते २२ फुट खोल असलेल्या विहिरीने कधीच तळ गाठला असल्याने एक माणूस या विहिरीत उतरतो आणि लहान भांड्याद्वारे लामण्यात (वरून दोरी बांधून खाली सोडलेल्या डब्यात) पाणी भरतो ते वर खेचून हंड्यात ओतले जाते.अशा पद्धतीने एक हंडा भरण्यास किमान एक तास लागत असल्याने हंडा-कळशांची लागलेली लांबच लांब रांग आणि महिलांचा कायम चालू असलेला कलकलाट हे दृश्य येथे नेहमी दिसते आहे. धरण उशाला, कोरड घशाला असे चित्र खऱ्या अर्थाने येथे पहावयास मिळते आहे, धरणाच्या कुशीत वसलेल्या या आदिवासी पाड्यांमधील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती केव्हा थांबेल, हा एकच प्रश्न येथील आदिवासी जनतेला पडला आहे. (वार्ताहर)