शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

तानसा धरणक्षेत्रात हंडा, कळशी अन टिकाव, कुदळसुद्धा...!

By admin | Updated: April 29, 2016 04:02 IST

तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

भातसानगर : शहापूर तालुक्यात नव्याने येणार्या धरण प्रकल्पांना पुनर्वसनाच्या प्रश्नावरून विरोध होत असतानाच ब्रिटीश राजवटीत मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेल्या तानसा धरण क्षेत्रातील गावातील बहुसंख्य आदिवासी बांधवाना आजही दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तानसा परिसरातील सावरदेव, उंबरपाडा, नांदगाव, हेदूचापाडा, वैगेरे अनेक गावातील ग्रामस्थ धरणातील पाणी साठ्याच्या मागील भागात नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात खड्डे खोदून त्यातील पाण्यावर आपली गरज भागवत असून आज खोदलेला खड्डा उद्या कोरडा पडत असल्याने तो पुन्हा नव्याने खोदण्याचा उद्योग दररोज करावा लागत आहे. ऐरवी पाण्यासाठी हंडा, कळशी, घेऊन जाणाऱ्या महिलांना आता जोडीला टिकाव किंवा कुदळ बरोबर घेऊन भटकंती करावी लागत आहे.या परिसरातील सावरदेव गावातील एकमेव २० ते २२ फुट खोल असलेल्या विहिरीने कधीच तळ गाठला असल्याने एक माणूस या विहिरीत उतरतो आणि लहान भांड्याद्वारे लामण्यात (वरून दोरी बांधून खाली सोडलेल्या डब्यात) पाणी भरतो ते वर खेचून हंड्यात ओतले जाते.अशा पद्धतीने एक हंडा भरण्यास किमान एक तास लागत असल्याने हंडा-कळशांची लागलेली लांबच लांब रांग आणि महिलांचा कायम चालू असलेला कलकलाट हे दृश्य येथे नेहमी दिसते आहे. धरण उशाला, कोरड घशाला असे चित्र खऱ्या अर्थाने येथे पहावयास मिळते आहे, धरणाच्या कुशीत वसलेल्या या आदिवासी पाड्यांमधील महिलांची पाण्यासाठी होणारी भटकंती केव्हा थांबेल, हा एकच प्रश्न येथील आदिवासी जनतेला पडला आहे. (वार्ताहर)