शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

तायल यांचा नवा ‘आदर्श घोटाळा’

By admin | Updated: November 5, 2014 23:32 IST

सुभाष मळगी : रेल्वे रसातळाला नेण्याचा डाव

रत्नागिरी : कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानूप्रकाश तायल यांनी कोकण रेल्वे रसातळाला नेण्याचा सपाटा लावला आहे. त्याअंतर्गतच कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी २७ कोटी निधी उचलला. मात्र, त्यातून ज्या ठिकाणी घरांसाठी जागा घेतल्या त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या नाहीतच शिवाय ५० ते ६० लाख किमतीचे फ्लॅट्स सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना परवडणार कसे? जागाखरेदीही बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने करुन या घरबांधणी प्रकल्पात तायल यांनी नवे आदर्श घोटाळा प्रकरण निर्माण केले आहे, असा आरोप कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष सुभाष मळगीयांनी पत्रकारांशी बोलताना केला.संचालक मंडळाच्या सभेत कर्मचाऱ्यांसाठी घरे देणार असल्याचे सांगत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आणि २७ कोटी रुपयांचा निधी यासाठी उचलला. कर्मचाऱ्यांना घरे हवीत. त्यामुळे त्यांना कोणत्या विभागात हवी, याचा कानोसा घेऊन वा त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेणे आवश्यक होते. खरेतर कर्मचाऱ्यांनीच घेतलेल्या जागेत घर उभारण्यासाठी त्यांना कर्ज देणे गरजेचे होते. परंतु आपल्या मनाप्रमाणे तायल आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी जागा खरेदी केल्या. २०११मध्ये उगवे, नवी मुंबई येथे ७५० चौरस मीटर, सालसेत - मडगाव येथे ५,५५० चौरस मीटर, सुरतकल मेंगलोरला १९ हजार ४० चौरस मीटर, तर जून २०१४मध्ये मिरजोळे येथे १३६० चौरस मीटर जागा खरेदी करण्यात आली. मात्र, ही जागा कर्मचाऱ्यांसाठी योग्य ठरेल की नाही, याचा कोणताही विचार केला गेला नाही, असा आरोप मळगी यांनीकेला.तसेच घेतलेल्या जागांचे दर हे बाजार मुल्याप्रमाणे कमी आहेत. असे असताना कागदोपत्री दाखवलेले हे त्याच्या दुप्पट आहेत. त्यामुळे यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. एका कर्मचाऱ्याला ७५ लाखाला घर घेणे परवडणारे आहे का? हा प्रश्नही निर्माण झाला आहे. त्यामुळे हा नवीन आदर्श घोटाळा उघड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मळगी म्हणाले.हा घोटाळा कोकण रेल्वेतील महाघोटाळा असून तो उघड झाल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते, असेही मळगी यांनी यावेळी सांगितले.े (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी २७ कोटी निधी उचलला.ज्या ठिकाणी घरांसाठी जागा घेतल्या त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या नाहीतच शिवाय ५० ते ६० लाख किमतीचे फ्लॅट्स आवाक्याबाहेरचे.जागाखरेदीही बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने.