शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

थर्टी फर्स्टच्या रात्री तळीरामांना टॅक्सीत बसवा

By admin | Updated: December 28, 2015 04:23 IST

नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते.

मुंबई : नवीन वर्षाचे स्वागत करताना बेभान होऊन वाहन चालवणाऱ्या ‘तळीराम’चालकांमुळे अपघाताला सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. याविरोधात वाहतूक पोलिसांकडून नेहमीच कारवाई केली जाते. मात्र ही कारवाई करतानाच बार अ‍ॅण्ड रेस्टॉरेंट चालकांनाही यासंदर्भात वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तळीराम ग्राहकाला टॅक्सी सेवा पुरवण्यात यावी किंवा त्याचे स्वत:चे वाहन असल्यास चालक देण्यात यावा, अशा सूचना करण्यात आल्या असून त्यामुळे अपघात होणार नाही, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना ‘तळीराम’चालकांचा बेभान आणि बेधुंदपणा नेहमीच दिसून येतो. त्यांच्या बेभानपणामुळे अपघातांनाही सामोरे जावे लागते. हे पाहता मुंबई वाहतूक पोलिसांनी तळीरामांना रोखण्यासाठी या वेळी चांगलीच कंबर कसली आहे. जादा वाहतूक पोलिसांची कुमक तैनात करताना पेट्रोलिंग करणाऱ्यांवर अधिक भर देण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी नवीन वर्षाचे स्वागत करताना ५२३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये तब्बल ३७0 दुचाकीस्वारांचा समावेश होता, तर १४३ कारचालक होते आणि सहा रिक्षा चालक होते. या तळीराम चालकांना रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी बार अँड रेस्टॉरन्ट चालकांना काही सूचना केल्या आहेत. या बाबत वाहतूक सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे म्हणाले की, ‘नशेत असणाऱ्या ग्राहकाकडे वाहन असल्यास त्याला चालक उपलब्ध करून देण्यात यावा. एखाद्याकडे वाहन नसल्यास टॅक्सीसेवा देण्यात यावी, असे समन्स असणारे पत्र देण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही गुन्हा त्यांच्याकडून घडणार नाही आणि वाहतूक पोलिसांनाही मदत होईल. त्याचप्रमाणे मुंबई शहर व उपनगरातील ९0 ठिकाणी नाकाबंदी करतानाच अचानक भेटही देऊन तपासणी करण्यात येणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. या कामांसाठी जवळपास दोन हजार वाहतूक पोलीस कार्यरत राहतील.