शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

शिवसेनेशी बोलणी यशस्वी होतील - देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

By admin | Updated: November 22, 2014 15:43 IST

राज्यातील सत्ता सहभागाबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून लवकरच यात यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - राज्यातील सत्ता सहभागाबाबत शिवसेनेसोबत चर्चा सुरू असून लवकरच यात यश मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेशी आमची जुनी मैत्री आहे आणि भविष्यातही दोन्ही पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध कायम राहतील, असेही ते म्हणाले. नवी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. 
भाजपा नेतृत्वाने शिवसेनेशी जुळवून घेत सर्वांत जुन्या मित्रपक्षासोबत पुन्हा एकत्र नांदण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील शिवसेना असो वा पंजाबमधील शिरोमणी अकाली दल, भाजपाने आपल्या सर्व मित्रपक्षांना एकत्र ठेवून रालोआला बळकट बनविण्याचे ठरविले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे हे विधान अतिशय महत्वाचे मानले जात आहे. भाजपा व शिवसेनेदरम्यान आरएसएस कोणतीही मध्यस्थी करत नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. 
या कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रवादीने भाजपाला दिलेल्या अप्रत्यक्ष पाठिंब्यावरही उत्तर दिले. ते म्हणाले राज्यात स्थिर सरकार यावे यासाठी राष्ट्रवादीने आम्हाला आपणहूनबिनशर्त पाठिंबा दिला होता.
आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घेण्याबाबतही फडणवीस यांनी मत व्यक्त केले. गेल्या २२ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी जितकी टीका ऐकली नाही, त्याहून जास्त टीका मला विश्वासदर्शक ठरावानंतर पुढे तीन दिवस सहन करावी लागली असे त्यांनी सांगितले. मात्र आवाजी मतदानाने मंजूर झालेला ठराव हा वैध होता असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात त्यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली.  महाराष्ट्रात सरकार स्थापन करताना माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक म्हणजे मी केजरीवाल यांच्याप्रमाणे पळ काढू शकलो असतो किंवा स्वत:वर विश्वास ठेऊन आहे त्या परिस्थितीला सामोरा गेलो असतो. मी दुसरा पर्याय निवडला. माझ्या शब्दांपक्षा माझं काम जास्त बोलेल, याचा मला विश्वास होता असेही त्यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले.