शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांसाठी वार्ता विघ्नाची!

By admin | Updated: August 25, 2014 04:09 IST

कोकण रेल्वेमार्गावरील वीर आणि करंजाडी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीचे ८ डबे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली

खेड/महाड : कोकण रेल्वेमार्गावरील वीर आणि करंजाडी स्थानकांदरम्यान मालवाहू गाडीचे ८ डबे रविवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेच्या १४ फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, लांब पल्ल्याच्या सात गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळे ऐन गणेशोत्सवासाठी कुटुंबकबिल्यासह निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. गाड्या खोळंबल्याने अनेक स्थानकांवर प्रवासी संतप्त झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांत कोकण रेल्वेमार्गावरील गाडी घसरण्याची ही चौथी घटना आहे. दरम्यान, घसरलेले डबे बाजूला काढण्याचे तसेच रेल्वेमार्ग सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सोमवारी दुपारपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे या मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्याची माहिती करंजाडी स्टेशन मास्तर राजकुमार आंबास्ता यांनी दिली. या मालगाडीतून गव्हाची वाहतूक करण्यात येत होती. मालगाडीच्या घसरलेले आठ डबे सोडून ही मालगाडी सकाळी ८.३० वाजता रत्नागिरीकडे रवाना करण्यात आली. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे आधीच हैराण झालेल्या चाकरमान्यांच्या प्रवासामध्ये या घटनेमुळे विघ्न निर्माण झाले आहे. मालगाडी वीर ते करंजाडी स्टेशनांदरम्यान घरसल्यामुळे रेल्वे प्रवाशांना पुढील प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या महाड व खेड आगारातून सुमारे ५०हून अधिक गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महाड आगारातून यासाठी २५ बसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती महाडचे वाहतूक निरीक्षक शिवाजी जाधव यांनी दिली. (वार्ताहर)