शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी मोदींशी चर्चा

By admin | Updated: May 7, 2017 04:29 IST

‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या दाहकतेची जाणीव मी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करून दिली आहे. उत्तरप्रदेशाप्रमाणे संपूर्ण देशातही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे. बघू या.. आता पुढं काय होतंय ते,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. पवार हे पुस्तकांचे गाव भिलार येथे मुक्कामी आले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कर्जमाफीची घोषणा मोदींनी उत्तरप्रदेशामध्ये केली. त्यांची घोषणा संपूर्ण देशाला लागू पडते. कर्जमाफी केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाईट सवय लागेल, असा आरोप होत असेल तर मग उत्तरप्रदेशामध्ये कशी काय कर्जमाफी केली? मग आम्ही काय भारताबाहेर आहे काय?राष्ट्रपतीपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी पुन्हा एकदा मी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना आणि डाव्या चळवळीतील लोकांना उमेदवार हवा म्हणून त्यांनी माझे नाव पुढे केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मतांची बेरीज यात खूप मोठा फरक आहे. देशभरातील मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता त्यांना पंधरा हजार मते कमी आहेत. विरोधी पक्ष एकत्र नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही मते मिळविणे फार अवघड नाही. ममता बॅनर्जी आणि डावे एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र राष्ट्रपती पदासाठी एकमताने निर्णय होऊ शकतो आणि असे नाव एकमताने पुढे येऊ शकते, असेही पवार म्हणाले.काँग्रेस- राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्षयात्रेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी खूप दिवसांनी चांगल्या प्रश्नांवर एकत्र आली. त्याचा मला आनंद आहे. सरकारविरोधी जनमत तयार करण्याचा यानिमित्ताने चांगला प्रयत्न झाला, असेही पवार म्हणाले. मोदी वर्कोहोलिक... पण एकट्याने निर्णय घेणारेअटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी सामूहिकपणे काम करत टीमवर्क केले तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच खूप काम करतात. काही माणसे अल्कोहोलिक असतात, तसे मोदी हे वर्कोहोलिक आहेत. ‘छत्रपतींची गादी असलेल्या साताऱ्याबद्दल मी काय बोलावे? याक्षणी एवढेच सांगू इच्छितो की, राजकीय नेत्यांनी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्याचे तारतम्य बाळगावे. नसते उद्योग करणारी मंडळी सोबत असली की, प्रकरण अंगलट येते,’