शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
4
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
5
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
6
संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
7
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
8
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
9
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
10
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
11
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
12
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
13
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
14
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
15
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
16
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
17
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
18
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
19
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
20
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?

कर्जमाफीसाठी मोदींशी चर्चा

By admin | Updated: May 7, 2017 04:29 IST

‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या दाहकतेची जाणीव मी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करून दिली आहे. उत्तरप्रदेशाप्रमाणे संपूर्ण देशातही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे. बघू या.. आता पुढं काय होतंय ते,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. पवार हे पुस्तकांचे गाव भिलार येथे मुक्कामी आले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कर्जमाफीची घोषणा मोदींनी उत्तरप्रदेशामध्ये केली. त्यांची घोषणा संपूर्ण देशाला लागू पडते. कर्जमाफी केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाईट सवय लागेल, असा आरोप होत असेल तर मग उत्तरप्रदेशामध्ये कशी काय कर्जमाफी केली? मग आम्ही काय भारताबाहेर आहे काय?राष्ट्रपतीपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी पुन्हा एकदा मी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना आणि डाव्या चळवळीतील लोकांना उमेदवार हवा म्हणून त्यांनी माझे नाव पुढे केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मतांची बेरीज यात खूप मोठा फरक आहे. देशभरातील मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता त्यांना पंधरा हजार मते कमी आहेत. विरोधी पक्ष एकत्र नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही मते मिळविणे फार अवघड नाही. ममता बॅनर्जी आणि डावे एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र राष्ट्रपती पदासाठी एकमताने निर्णय होऊ शकतो आणि असे नाव एकमताने पुढे येऊ शकते, असेही पवार म्हणाले.काँग्रेस- राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्षयात्रेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी खूप दिवसांनी चांगल्या प्रश्नांवर एकत्र आली. त्याचा मला आनंद आहे. सरकारविरोधी जनमत तयार करण्याचा यानिमित्ताने चांगला प्रयत्न झाला, असेही पवार म्हणाले. मोदी वर्कोहोलिक... पण एकट्याने निर्णय घेणारेअटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी सामूहिकपणे काम करत टीमवर्क केले तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच खूप काम करतात. काही माणसे अल्कोहोलिक असतात, तसे मोदी हे वर्कोहोलिक आहेत. ‘छत्रपतींची गादी असलेल्या साताऱ्याबद्दल मी काय बोलावे? याक्षणी एवढेच सांगू इच्छितो की, राजकीय नेत्यांनी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्याचे तारतम्य बाळगावे. नसते उद्योग करणारी मंडळी सोबत असली की, प्रकरण अंगलट येते,’