शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी मोदींशी चर्चा

By admin | Updated: May 7, 2017 04:29 IST

‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील साडेबारा हजारांपैकी साडेनऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या केवळ महाराष्ट्रातील आहेत. या प्रश्नाच्या दाहकतेची जाणीव मी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून करून दिली आहे. उत्तरप्रदेशाप्रमाणे संपूर्ण देशातही कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांना केली आहे. बघू या.. आता पुढं काय होतंय ते,’ अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. पवार हे पुस्तकांचे गाव भिलार येथे मुक्कामी आले आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘कर्जमाफीची घोषणा मोदींनी उत्तरप्रदेशामध्ये केली. त्यांची घोषणा संपूर्ण देशाला लागू पडते. कर्जमाफी केली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाईट सवय लागेल, असा आरोप होत असेल तर मग उत्तरप्रदेशामध्ये कशी काय कर्जमाफी केली? मग आम्ही काय भारताबाहेर आहे काय?राष्ट्रपतीपदासाठी आपल्या नावाची चर्चा सुरू आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी पुन्हा एकदा मी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांना आणि डाव्या चळवळीतील लोकांना उमेदवार हवा म्हणून त्यांनी माझे नाव पुढे केले आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मतांची बेरीज यात खूप मोठा फरक आहे. देशभरातील मतांची आकडेवारी लक्षात घेतली असता त्यांना पंधरा हजार मते कमी आहेत. विरोधी पक्ष एकत्र नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ही मते मिळविणे फार अवघड नाही. ममता बॅनर्जी आणि डावे एकत्र येऊ शकत नाहीत. मात्र राष्ट्रपती पदासाठी एकमताने निर्णय होऊ शकतो आणि असे नाव एकमताने पुढे येऊ शकते, असेही पवार म्हणाले.काँग्रेस- राष्ट्रवादीने काढलेल्या संघर्षयात्रेचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी खूप दिवसांनी चांगल्या प्रश्नांवर एकत्र आली. त्याचा मला आनंद आहे. सरकारविरोधी जनमत तयार करण्याचा यानिमित्ताने चांगला प्रयत्न झाला, असेही पवार म्हणाले. मोदी वर्कोहोलिक... पण एकट्याने निर्णय घेणारेअटलबिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी सामूहिकपणे काम करत टीमवर्क केले तर आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकटेच खूप काम करतात. काही माणसे अल्कोहोलिक असतात, तसे मोदी हे वर्कोहोलिक आहेत. ‘छत्रपतींची गादी असलेल्या साताऱ्याबद्दल मी काय बोलावे? याक्षणी एवढेच सांगू इच्छितो की, राजकीय नेत्यांनी आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तींची शहानिशा करण्याचे तारतम्य बाळगावे. नसते उद्योग करणारी मंडळी सोबत असली की, प्रकरण अंगलट येते,’