शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
3
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
4
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
5
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
6
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
7
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
8
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
9
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
10
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
11
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
13
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
14
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
15
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
16
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
17
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
19
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
20
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   

पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम

By admin | Updated: June 13, 2016 05:30 IST

दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते.

मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गेल्या चार (जानेवारी ते एप्रिल) महिन्यात मुंबई शहर व उपनगरांत करण्यात आलेल्या कारवाईत ८ हजार ७0३ तळीराम चालक आढळले असून, पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३९४ तळीराम चालकांवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय गेल्या जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. मात्र त्याची अजून ठोस अशी अंमलबजावणी अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलीस लक्ष केंद्रित करीत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८,७0३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक तळीराम चालक हे वांद्रे, सांताक्रूझ, डी.एन.नगर, बीकेसी, वाकोला, सहार या पश्चिम विभाग परिसरात आढळले आहेत. या विभागात जवळपास २,३९४ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या उत्तर परिमंडळातही करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार २८७ जण आढळले आहेत. यात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक आहेत.