शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम

By admin | Updated: June 13, 2016 05:30 IST

दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते.

मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गेल्या चार (जानेवारी ते एप्रिल) महिन्यात मुंबई शहर व उपनगरांत करण्यात आलेल्या कारवाईत ८ हजार ७0३ तळीराम चालक आढळले असून, पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३९४ तळीराम चालकांवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय गेल्या जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. मात्र त्याची अजून ठोस अशी अंमलबजावणी अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलीस लक्ष केंद्रित करीत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८,७0३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक तळीराम चालक हे वांद्रे, सांताक्रूझ, डी.एन.नगर, बीकेसी, वाकोला, सहार या पश्चिम विभाग परिसरात आढळले आहेत. या विभागात जवळपास २,३९४ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या उत्तर परिमंडळातही करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार २८७ जण आढळले आहेत. यात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक आहेत.