शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
2
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
3
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
4
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
5
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
6
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
7
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
8
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
9
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
10
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
11
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
12
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
13
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
14
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
15
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
16
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
17
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
18
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
19
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
20
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर

पश्चिम उपनगरांत सर्वाधिक तळीराम

By admin | Updated: June 13, 2016 05:30 IST

दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते.

मुंबई : दारू पिऊन वाहन चालविणे हा गुन्हा असून, त्याविरोधात तळीराम चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाते. गेल्या चार (जानेवारी ते एप्रिल) महिन्यात मुंबई शहर व उपनगरांत करण्यात आलेल्या कारवाईत ८ हजार ७0३ तळीराम चालक आढळले असून, पश्चिम विभागात सर्वाधिक म्हणजे २ हजार ३९४ तळीराम चालकांवर कारवाई झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली. दरवर्षी १५ हजारांपेक्षा जास्त चालक पोलिसांच्या जाळ्यात अडकतात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करताना समज दिली जाते. पुन्हा गुन्हा घडल्यास लायसन्स रद्दही केले जाते. महत्त्वाची बाब म्हणजे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे अपघातही होतात. या प्रकारांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून बारमध्ये मद्यपान केलेल्या ग्राहकाच्या शरीरातील दारूचे प्रमाण तपासणारी ‘अल्कोबूथ’मशिन मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सबाहेर बसविण्याचा निर्णय गेल्या जानेवारी महिन्यात घेण्यात आला होता. मात्र त्याची अजून ठोस अशी अंमलबजावणी अद्याप तरी झालेली नाही. त्यामुळे वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याकडेच वाहतूक पोलीस लक्ष केंद्रित करीत आहेत. गेल्या चार महिन्यांत ८,७0३ तळीराम चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सर्वाधिक तळीराम चालक हे वांद्रे, सांताक्रूझ, डी.एन.नगर, बीकेसी, वाकोला, सहार या पश्चिम विभाग परिसरात आढळले आहेत. या विभागात जवळपास २,३९४ चालकांवर कारवाई झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. त्यानंतर मुंबईतील जोगेश्वरी, दिंडोशी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या उत्तर परिमंडळातही करण्यात आलेल्या कारवाईत २ हजार २८७ जण आढळले आहेत. यात दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक आहेत.