शहरं
Join us  
Trending Stories
1
"जरांगेंना दिलेल्या कागदाचा टाचणी एवढाही उपयोग नाही"; मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांचे स्पष्ट मत
2
गुलाल, आतषबाजी आणि घोषणांच्या गजरात मनोज जरांगे मध्यरात्री संभाजीनगरात; रुग्णालयात दाखल, आरामाचा सल्ला
3
Share Market News: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; 'या' कंपन्यांच्या शेअरची जबरदस्त सुरुवात
4
आजचे राशीभविष्य, ०३ सप्टेंबर २०२५: आज नवीन काम सुरू करू नका, स्वकीयांचे गैरसमज होतील
5
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी
6
राणीला २६ वर्षाच्या बॉयफ्रेंडनेच संपवलं, हत्या केल्यानंतर अरुणने पोलिसांना काय सांगितलं?
7
आंदोलकांच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांनी मागितली कोर्टाची माफी, आणखी काय-काय घडलं?
8
केवळ गणपतीत नाही, कायम ‘हे’ स्तोत्र म्हणा; आयुष्यभर जे हवे ते प्राप्त होईल, शुभ-कल्याण घडेल!
9
रशियाचे तेल झाले आणखी स्वस्त! अमेरिकन टॅरिफमुळे भारतासाठी संकटासोबत आली संधीही
10
समसप्तक चतुर्ग्रही ग्रहण योग: ८ राशींना लॉटरी, पद-पैसा-प्रतिष्ठा; अकल्पनीय लाभ-नफा-फायदा!
11
जिंकलो रे राजेहो ! उपोषण सोडताना मनोज जरांगे यांचे आनंदोद्गार; आंदोलकांनी उधळला गुलाल
12
"सिनेमातील माझे बोल्ड सीन्स आईवडिलांना पाठवतात...", अभिनेत्रीने ट्रोलर्सवर व्यक्त केला संताप
13
टीम इंडियाच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी अर्ज करा! BCCIने मागविल्या बोली; अंतिम तारीखही दिली
14
सोन्यातून वर्षभरात ३४% तर चांदीतून ४०% परतावा; गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून विचार
15
कळा वाढल्याने भररस्त्यात रुग्णवाहिकेतच केली प्रसूती; डॉक्टरांच्या निर्णयामुळे मायलेक सुखरूप
16
इलेक्ट्रॉनिक्ससह रोजच्या वापरातील वस्तू होणार स्वस्त, EVवर टॅक्स; GST परिषदेची आजपासून बैठक
17
मोठी झेप! भारताने बनविली स्वदेशी ‘विक्रम’ चिप! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
18
माझ्या आईबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना बिहारची जनता माफ करणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी
19
एलिफंटा, न्हावा बेटावर पर्यटनासाठी मास्टर प्लॅनिंग; सिडको करणार विकास; ग्रामस्थ संभ्रमात
20
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल

क्षयरोगावर उपचार न घेणे इतरांसाठी घातक

By admin | Updated: March 24, 2015 02:29 IST

क्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे.

सावधान : एका रुग्णाकडून वर्षात १० ते १५ जणांना संसर्गाचा धोकापूजा दामले- मुंबईक्षयरोगावर उपचार न घेता तो तसाच कायम ठेवला तर एका रोग्याकडून वर्षभरात सुमारे १० ते १५ लोकांना या रोगाची लागण होण्याचा धोका डॉक्टरांनी अधोरेखित केला आहे. क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर तत्काळ उपचार सुरू न करणे, हे अत्यंत घातक ठरते. हा रोग टप्प्याटप्प्याने वाढत नाही. अचानक उसळून येतो. यामुळेच प्रत्येक दिवस धोक्याची तीव्रता वाढवत असतो. जास्त घनतेच्या परिसरात राहणाऱ्या, झोपडपट्टीसदृश ठिकाणी राहणाऱ्या लोकांना क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक असतो, असे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.भारतात दरवर्षी सुमारे ८ ते १० लाख नवे क्षयरोगाचे रुग्ण आढळून येतात. ३० लाख क्षयरोग रुग्ण दरवर्षी उपचार घेत असतात. भारतात क्षयरोगाचे विषाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसते. आपल्याकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. रस्त्यावर थुंकण्याच्या सवयीमुळे क्षयरोग वेगाने पसरतो, असे ग्लोबल रुग्णालयाचे श्वसनविकार तज्ज्ञ डॉ. समीर गरदे यांनी सांगितले. क्षयरोगामुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण भारतात वाढत आहे. २०११ च्या आकडेवारीनुसार, भारतात २ ते ३ मिनिटाला एकाचा मृत्यू हा क्षयरोगामुळे होतो. क्षयरोगावर वेळीच उपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र अजूनही याबाबत म्हणावी तितकी जनजागृती झालेली नाही. यामुळे क्षयरोगाचे काही रुग्ण मध्येच उपचार सोडून देतात. मध्येच उपचार सोडल्याने काही दिवसांतच क्षयरोगाचे विषाणू औषधांना दाद देत नाहीत. अशा व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्यालाही औषधांना दाद न देणारा क्षयरोग होतो, ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे डॉ. गरदे यांनी सांगितले.च्क्षयरोग हा फक्त फुप्फुसांना नाही, तर केस आणि नखे सोडून शरीरातील सर्व अवयवांना होऊ शकतो. फुप्फुसांना होणाऱ्या क्षयरोगाचे प्रमाण ४० टक्के इतके असते. च्मणका, हीप बोन, सांधे, मेंदू या अवयवांनादेखील क्षयरोग होण्याचे प्रमाण अधिक आहे. याचबरोबरीने काही वेळा क्षयरोग झाल्यास घशात गाठी येतात. फुप्फुसाचा क्षयरोग हा संसर्गजन्य असतो. च्इतर कोणतेही क्षयरोग संसर्गजन्य नसतात. या क्षयरोगावर २४ ते २७ महिने उपचार घेतल्यास पूर्णपणे बरा होतो.