शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:21 IST

पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे;

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे; मात्र दुसऱ्या बाजूला विमानतळबाधित गावांशी घोषणा झाल्यापासून आजवर कोणीही साधी चर्चाही केली नसल्याने गावा-गावांत साशंकतेचे वातावरणही आहे. त्यामुळे पुरंदरच्या ‘टेकआॅफ’साठी कभी हाँ...कभी ना.. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असल्याने अनेक वर्षे दुष्काळी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. येथील जनजीवन उंचावणार आहे. म्हणून तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, गोडावून, तरुणांना नोकऱ्या, व्यवसाय करण्यासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे. मात्र बाधित गावांतील शेतकऱ्यांचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. या विमानतळासाठी आम्ही एक इंचही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आमच्या समस्या कोणी ऐकून घेत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. >जमिनींसाठी श्रीमंतांच्या फेऱ्या वाढल्या पुरंदर तालुक्यात जमिनी खरेदी करण्यासाठी उद्योगपतींच्या घिरट्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. माझी जमीन घेता का जमीन म्हणणारे शेतकरी विमानतळाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे.>शेतकऱ्यांचे कल्याण होणारआंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे तालुक्याचा विकास होतानाच बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा, जमिनीतील दहा वर्षांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार असल्याने दहा पिढ्यांचे कल्याण होणार असल्याचे चित्र उभे केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल; परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर लहुजी शक्ती सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना>गावांचा प्रखर विरोधराजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या बाधित गावांची जमीन जाणार असल्याने या गावाचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. विमानतळ होऊ नये, यासाठी बाधित गावांमधील शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत पाडव्याला काळ््या गुढ्या उभारल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक सुधारणा केल्या आहेत. पाइपलाइन, शेती ठिबक सिंचनाखाली आणून फळबागा फुलवल्या आहेत. दुष्काळी पुरंदर तालुक्यातील शेतीला प्रयत्नपूर्वक सुगीचे दिवस आले असताना आमच्या जमिनी जाणार अशी शेतकऱ्यांची भावना आहे.