शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

‘टेकआॅफ’ला ‘कभी हाँ, कभी ना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2016 01:21 IST

पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे;

भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात विमानतळ होणार म्हणून अनेक गावांत उत्साही वातावरण आहे; मात्र दुसऱ्या बाजूला विमानतळबाधित गावांशी घोषणा झाल्यापासून आजवर कोणीही साधी चर्चाही केली नसल्याने गावा-गावांत साशंकतेचे वातावरणही आहे. त्यामुळे पुरंदरच्या ‘टेकआॅफ’साठी कभी हाँ...कभी ना.. अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असल्याने अनेक वर्षे दुष्काळी तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. येथील जनजीवन उंचावणार आहे. म्हणून तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. या ठिकाणी मोठमोठ्या कंपन्या, गोडावून, तरुणांना नोकऱ्या, व्यवसाय करण्यासाठी भविष्यात मोठी संधी निर्माण होणार आहे. मात्र बाधित गावांतील शेतकऱ्यांचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. या विमानतळासाठी आम्ही एक इंचही जागा देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. आमच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असताना आम्हाला विश्वासात घेतले जात नाही. आमच्या समस्या कोणी ऐकून घेत नसल्याची खंत येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. >जमिनींसाठी श्रीमंतांच्या फेऱ्या वाढल्या पुरंदर तालुक्यात जमिनी खरेदी करण्यासाठी उद्योगपतींच्या घिरट्या मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या आहेत. माझी जमीन घेता का जमीन म्हणणारे शेतकरी विमानतळाच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. यामुळे एजंट लोकांचा सुळसुळाट झाला आहे.>शेतकऱ्यांचे कल्याण होणारआंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळामुळे तालुक्याचा विकास होतानाच बाधित शेतकऱ्यांना जमिनीचा परतावा, जमिनीतील दहा वर्षांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार असल्याने दहा पिढ्यांचे कल्याण होणार असल्याचे चित्र उभे केले जात आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, त्यात विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या पुनर्वसनाचे काय? आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुरंदर तालुक्याचा विकास होईल; परंतु त्या मातीत जन्मलेल्या लोकांची माती करू नका. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत असतानाच राजकारण करू नका. शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, तर लहुजी शक्ती सेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहील. - मस्कू शेंडगे, जिल्हाध्यक्ष, लहुजी शक्ती सेना>गावांचा प्रखर विरोधराजेवाडी, आंबळे, वाघापूर, पारगाव, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या बाधित गावांची जमीन जाणार असल्याने या गावाचा या विमानतळास तीव्र विरोध आहे. विमानतळ होऊ नये, यासाठी बाधित गावांमधील शेतकऱ्यांनी ऐन दिवाळीत पाडव्याला काळ््या गुढ्या उभारल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीत अनेक सुधारणा केल्या आहेत. पाइपलाइन, शेती ठिबक सिंचनाखाली आणून फळबागा फुलवल्या आहेत. दुष्काळी पुरंदर तालुक्यातील शेतीला प्रयत्नपूर्वक सुगीचे दिवस आले असताना आमच्या जमिनी जाणार अशी शेतकऱ्यांची भावना आहे.