शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

रस्त्यावरील ‘त्या’ मुलांचेही सर्वेक्षण करा

By admin | Updated: July 1, 2016 03:59 IST

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर बालपण व्यतित करणाऱ्या मुलांची संंख्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) सर्वेक्षणामुळे उघडकीस आली.

मुंबई : मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर बालपण व्यतित करणाऱ्या मुलांची संंख्या टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सच्या (टिस) सर्वेक्षणामुळे उघडकीस आली. परंतु, राज्यातील अन्य शहरांत अशाच प्रकारे रस्त्यांवर जीवन जगणाऱ्या मुलांची संख्या अद्याप समोर न आल्याने, उच्च न्यायालयाने मुंबईप्रमाणेच राज्यातील अन्य शहरांतील रस्त्यांवर राहणाऱ्या मुलांचेही सर्वेक्षण करण्यात यावे, अशी सूचना गुरुवारी राज्य सरकारला केली.मुंबईच्या रस्त्यांवर ३९ हजार मुले राहत असल्याचे टिसने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे समोर आले आहे. सर्वेक्षणानंतर सर्व मुलांना ओळखपत्र देण्यात आले. ही मुले मुंबईच्या बाहेरची असल्याने त्यांना हे ओळखपत्र मिळू शकले, असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठाने म्हटले. रस्त्यावर भीक मागून जीवन व्यतित करणाऱ्या मुलांचे पुनर्वसन करण्यात यावे व त्यांना शिक्षण देण्यात यावे, यासाठी अनेक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने मुंबईप्रमाणे अन्य शहरांतील रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे सर्वेक्षण करण्याची सूचना राज्य सरकारला केली.याचिकेच्या सुनावणीदरम्यान ‘न्यायालयाचे मित्र’ म्हणून नियुक्त करण्यात आलेले ज्येष्ठ वकील मिहीर देसाई यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. एच. मार्लापल्ले यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना रस्त्यावरील मुलांच्या पुनर्वसनाबाबत लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. या मुलांवर माफियांचे नियंत्रण आहे की नाही? याचा शोध लावा आणि आम्हाला कळवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अ‍ॅड. देसाई यांना देत या याचिकांवरील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवली आहे. गेल्या सुनावणीवेळी अन्य खंडपीठाने या मुलांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण आखण्याचे निर्देश दिले होते. विस्थापित मुलांचे पुनर्वसन करणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले होते. (प्रतिनिधी) >प्रशासनांना योग्य ते आदेश द्यावेत‘मुंबई, पुणे, ठाणे व राज्यातील अन्य महत्त्वाच्या शहरांत प्रवास करताना ३ ते १४ या वयोगटातील मुले भीक मागताना दिसतात. राज्यघटनेने त्यांना दिलेल्या शिक्षणाच्या अधिकाराचा बळी चढवत ही मुले भीक मागत असतात. त्यामुळे या मुलांना ताब्यात घेऊन त्यांना सुधारगृहात ठेवावे आणि त्यांना शिक्षण द्यावे, यासाठी राज्य सरकारसह संबंधित प्रशासनांना योग्य ते आदेश द्यावेत,’ असे न्या. मार्लापल्ले यांनी पत्रात म्हटले आहे. या मुलांवर माफियांचे नियंत्रण आहे की नाही? याचा शोध लावा आणि आम्हाला कळवा, असे निर्देश उच्च न्यायालयाने अ‍ॅड. देसाई यांना देत या याचिकांवरील सुनावणी ६ जुलै रोजी ठेवली आहे.