शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

दररोज पाण्यासाठी दम धरा

By admin | Updated: July 21, 2014 23:10 IST

दिवसाआड पाणीकपात आणखी काही दिवस कायम ठेवावी, अशी विनंती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केली.

पुणो :  शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत चांगला पाऊस सुरू झाला असला, तरी पुढील पावसाबाबत अनिश्चितता असल्याने शहरात सुरू असलेली दिवसाआड पाणीकपात आणखी काही दिवस कायम ठेवावी, अशी विनंती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केली. दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे जलवहिन्यांमध्ये हवा भरली जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये नागरिकांना तीन तीन दिवस पाणी मिळत नसल्याने दिवसाआड पाणीकपात रद्द करून शहरात एक वेळ पाणी द्यावे, अशी मागणी भाजपा-सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली, तसेच याबाबत आज निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. 
 शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेने 11 जुलैपासून शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, या कपातीचा फटका जलवाहिन्यांच्या शेवटच्या भागात नळजोड असलेल्या नागरिकांना बसत आहे. त्यातही प्रामुख्याने पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा असलेल्या पेठांच्या परिसरात जलवाहिनीत हवा भरल्याने नागरिकांना तीन तीन दिवस पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून टँकरची मागणी करण्यात आल्यानंतर पालिकेकडून टँकरही पाठविले जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे संतापलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. दिवसाआड कपात लागू केल्यानंतर धरणांमध्ये सुमारे 1.1क् टीएमसी पाणी होते. आता हा साठा सहा टीएमसीवर पोहोचला आहे. हे पाणी एक वेळ पाणी देण्यात आल्यानंतरही शहरास सहा महिने पुरेल, एवढे असल्याने तत्काळ ही कपात मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी, तसेच रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांनी आणखी काही दिवस वाट पाहून हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर दिवसातून एकदा पाणी द्यावे, पण त्याची वेळ कमी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. मात्र, पाण्याची स्थिती बिकट असल्याची बाब निदर्शनास आणून देत आयुक्त विकास देशमुख यांनी एक वेळ पाणी देण्याच्या निर्णयासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी, अशी विनंती सभागृहास केली. (प्रतिनिधी)
 
पाणीस्थिती बिकटच - आयुक्त 
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होत असली, तरी अद्यापर्पयत एकाही धरणात जोराचा पाऊस झाला नसल्याचे सांगत पाण्याची स्थिती बिकट असल्याचे आयुक्त देशमुख यांनी या वेळी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी होणा:या मनस्तापामुळे सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या आपण समजू शकतो. 
पण पावसाची स्थिती आणि वेधशाळेने पुढे वर्तविलेले अंदाज पाहता धरणांच्या पाणलोट क्षेत्रत या वर्षी 25 टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणो जेमतेमच भरतील.  या वर्षी धरणामधून पाण्याचा ओव्हरफ्लो होणार नाही. 
त्यामुळे धरणात आणखी पाणी वाढल्यानंतरच कपात कमी करणो सयुक्तिक होईल. मात्र, घाईघाईने कोणताही निर्णय न घेता, प्रशासनास वेळ द्यावा, तसेच आणखी काही दिवस वाट पाहावी यासाठी आपण सभागृहास नम्र विनंती करतो, असे देशमुख या वेळी म्हणाले. 
 
दिवसातून चारऐवजी दोन तासांचा प्रस्ताव 
दिवसाआड पाण्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने प्रशासनाने पूर्वीप्रमाणोच एक वेळ पाणी देताना, चार तासांऐवजी दोनच तास पाणी द्यावे, पण दररोज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात केली. त्यासाठी प्रशासनाने 8क्क् एमएलडीऐवजी 9क्क्  ते 95क् एमएलडी पाणी दररोज घ्यावे, असे ते म्हणाले. मात्र, जलवाहिन्यांमधील सदोषामुळे हे शक्य नसल्याचे आयुक्तांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, नगरसेवकांनी काही वेळ दिल्यास या प्रस्तावाची प्रत्यक्ष तांत्रिक  चाचपणी करून ते शक्य आहे, हे पाण्याचे  आश्वासन देशमुख यांनी सभागृहास दिले. याबाबत येत्या दोन दिवसांत तपासणी शक्य असल्यास हा  निर्णय घेऊ, असेही देशमुख म्हणाले.
 
1क्  टीएमसी साठा झाल्यावर निर्णय घेणार 
आयुक्त देशमुख यांनी खुलासा केल्यानंतरही काँग्रेस तसेच भाजपा-सेनेच्या नगरसेवकांनी कपात रद्द करण्याबाबत आयुक्तांनी ठोस मुदत जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी आयुक्तांनी धरणांमध्ये 1क् टीएमसी पाणीसाठा आल्यानंतर पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, ज्या भागात टँकरची गरज असेल, तेथे स्वतंत्र सोय करण्याचे आश्वासन 
दिले. तर सभागृहनेते सुभाष जगताप यांनी एक वेळ पाण्याबाबत 
निर्णय घेण्यासाठी नगरसेवकांच्या वतीने प्रशासनास चार दिवसांची 
मुदत दिली.