शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दररोज पाण्यासाठी दम धरा

By admin | Updated: July 21, 2014 23:10 IST

दिवसाआड पाणीकपात आणखी काही दिवस कायम ठेवावी, अशी विनंती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केली.

पुणो :  शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत चांगला पाऊस सुरू झाला असला, तरी पुढील पावसाबाबत अनिश्चितता असल्याने शहरात सुरू असलेली दिवसाआड पाणीकपात आणखी काही दिवस कायम ठेवावी, अशी विनंती महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी आज महापालिकेच्या मुख्य सभेत केली. दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे जलवहिन्यांमध्ये हवा भरली जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्ये नागरिकांना तीन तीन दिवस पाणी मिळत नसल्याने दिवसाआड पाणीकपात रद्द करून शहरात एक वेळ पाणी द्यावे, अशी मागणी भाजपा-सेनेसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली, तसेच याबाबत आज निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला. 
 शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणलोट क्षेत्रत कमी पाणीसाठा असल्याने महापालिकेने 11 जुलैपासून शहरात दिवसाआड पाणीकपात सुरू केली आहे. मात्र, या कपातीचा फटका जलवाहिन्यांच्या शेवटच्या भागात नळजोड असलेल्या नागरिकांना बसत आहे. त्यातही प्रामुख्याने पर्वती जलकेंद्रावर पाणीपुरवठा असलेल्या पेठांच्या परिसरात जलवाहिनीत हवा भरल्याने नागरिकांना तीन तीन दिवस पाणीच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांकडून टँकरची मागणी करण्यात आल्यानंतर पालिकेकडून टँकरही पाठविले जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे संतापलेल्या काँग्रेस आणि भाजपाच्या नगरसेवकांनी प्रशासनास चांगलेच धारेवर धरले. दिवसाआड कपात लागू केल्यानंतर धरणांमध्ये सुमारे 1.1क् टीएमसी पाणी होते. आता हा साठा सहा टीएमसीवर पोहोचला आहे. हे पाणी एक वेळ पाणी देण्यात आल्यानंतरही शहरास सहा महिने पुरेल, एवढे असल्याने तत्काळ ही कपात मागे घ्यावी, अशी मागणी काँग्रेस, भाजपा व शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नगरसेवकांनी, तसेच रिपब्लिकन पक्षाच्या नगरसेवकांनी आणखी काही दिवस वाट पाहून हा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर दिवसातून एकदा पाणी द्यावे, पण त्याची वेळ कमी करावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ झाला. मात्र, पाण्याची स्थिती बिकट असल्याची बाब निदर्शनास आणून देत आयुक्त विकास देशमुख यांनी एक वेळ पाणी देण्याच्या निर्णयासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी, अशी विनंती सभागृहास केली. (प्रतिनिधी)
 
पाणीस्थिती बिकटच - आयुक्त 
शहराला पाणीपुरवठा करणा:या धरणांच्या पाणीसाठय़ात वाढ होत असली, तरी अद्यापर्पयत एकाही धरणात जोराचा पाऊस झाला नसल्याचे सांगत पाण्याची स्थिती बिकट असल्याचे आयुक्त देशमुख यांनी या वेळी सांगितले. नागरिकांना पाण्यासाठी होणा:या मनस्तापामुळे सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या आपण समजू शकतो. 
पण पावसाची स्थिती आणि वेधशाळेने पुढे वर्तविलेले अंदाज पाहता धरणांच्या पाणलोट क्षेत्रत या वर्षी 25 टक्के कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणो जेमतेमच भरतील.  या वर्षी धरणामधून पाण्याचा ओव्हरफ्लो होणार नाही. 
त्यामुळे धरणात आणखी पाणी वाढल्यानंतरच कपात कमी करणो सयुक्तिक होईल. मात्र, घाईघाईने कोणताही निर्णय न घेता, प्रशासनास वेळ द्यावा, तसेच आणखी काही दिवस वाट पाहावी यासाठी आपण सभागृहास नम्र विनंती करतो, असे देशमुख या वेळी म्हणाले. 
 
दिवसातून चारऐवजी दोन तासांचा प्रस्ताव 
दिवसाआड पाण्यामुळे समस्या निर्माण होत असल्याने प्रशासनाने पूर्वीप्रमाणोच एक वेळ पाणी देताना, चार तासांऐवजी दोनच तास पाणी द्यावे, पण दररोज द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहात केली. त्यासाठी प्रशासनाने 8क्क् एमएलडीऐवजी 9क्क्  ते 95क् एमएलडी पाणी दररोज घ्यावे, असे ते म्हणाले. मात्र, जलवाहिन्यांमधील सदोषामुळे हे शक्य नसल्याचे आयुक्तांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, नगरसेवकांनी काही वेळ दिल्यास या प्रस्तावाची प्रत्यक्ष तांत्रिक  चाचपणी करून ते शक्य आहे, हे पाण्याचे  आश्वासन देशमुख यांनी सभागृहास दिले. याबाबत येत्या दोन दिवसांत तपासणी शक्य असल्यास हा  निर्णय घेऊ, असेही देशमुख म्हणाले.
 
1क्  टीएमसी साठा झाल्यावर निर्णय घेणार 
आयुक्त देशमुख यांनी खुलासा केल्यानंतरही काँग्रेस तसेच भाजपा-सेनेच्या नगरसेवकांनी कपात रद्द करण्याबाबत आयुक्तांनी ठोस मुदत जाहीर करण्याची मागणी केली. या वेळी आयुक्तांनी धरणांमध्ये 1क् टीएमसी पाणीसाठा आल्यानंतर पाटबंधारे विभाग, तसेच जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच, ज्या भागात टँकरची गरज असेल, तेथे स्वतंत्र सोय करण्याचे आश्वासन 
दिले. तर सभागृहनेते सुभाष जगताप यांनी एक वेळ पाण्याबाबत 
निर्णय घेण्यासाठी नगरसेवकांच्या वतीने प्रशासनास चार दिवसांची 
मुदत दिली.