शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ‘रूम्हणे’ हातात घ्या-मुंढे

By admin | Updated: July 5, 2016 01:12 IST

बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले.

बुलडाणा : शेतकर्‍यांकडे पाहण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. यावेळी मतदारांना दाखविण्यात आलेले स्वप्ने खोटी होती. ही स्वप्ने खोटी असल्यामुळे पूर्ण होणारी नाहीत. अशी खोटी स्वप्ने दाखविणार्‍या विरूध्द व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हातात रूम्हणे घ्या, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलेले निवेदन स्विकारण्यासाठी ४ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, अँड.साहेबराव सरदार आदींची उपस्थिती होती. , यावेळी धनंजय मुंढे पुढे म्हणाले की, जनतेला पर्याय हवा होता आणि एक व्यक्ती देशाला फसवित होती. यावेळी त्याने दाखविलेली स्वप्ने खोटी होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपाने दाखविलेली स्वप्ने, घोषणा हवेत विरली. राज्य सरकारने राज्यातील २४ नगरपालिकेतील १७ हजार व्यापार्‍यांचा ३ हजार कोटीचा एलबीटी माफ केला आहे. या सरकारच्या १७ महिन्याच्या काळात ८ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत. सरकारला येणार्‍या पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धारेवर धरणार असल्याचे सांगून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, रूम्हणे हातात घेवून सळो की, पळो करून सोडा असे आवाहन त्यांनी केले.

'वर्षा'वर गाय घेऊन जाणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की आम्ही शेतकरी विरोधी नाही, मी पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. मलाही गाईचे दूध काढता येते, मात्र फक्त बसण्याची अडचण आहे. मी येणार्‍या काळात वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार आहे. त्यांना बसणे नाही म्हणून टेबलावर गाय उभी करुन मुख्यमंत्र्यांकडून दुध काढून घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता.