शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

संपूर्ण कर्जमुक्तीसाठी ‘रूम्हणे’ हातात घ्या-मुंढे

By admin | Updated: July 5, 2016 01:12 IST

बुलडाणा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात विरोधीपक्ष नेते मुंढे यांनी शेतक-यांना आवाहन केले.

बुलडाणा : शेतकर्‍यांकडे पाहण्यासाठी राज्य व केंद्र सरकारला वेळ नाही. लोकसभेच्या निवडणुकीत दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. यावेळी मतदारांना दाखविण्यात आलेले स्वप्ने खोटी होती. ही स्वप्ने खोटी असल्यामुळे पूर्ण होणारी नाहीत. अशी खोटी स्वप्ने दाखविणार्‍या विरूध्द व संपूर्ण कर्जमुक्तीसाठी हातात रूम्हणे घ्या, असे आवाहन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी २५ हजार शेतकर्‍यांच्या सह्या असलेले निवेदन स्विकारण्यासाठी ४ जुलै रोजी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे,जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, अँड.साहेबराव सरदार आदींची उपस्थिती होती. , यावेळी धनंजय मुंढे पुढे म्हणाले की, जनतेला पर्याय हवा होता आणि एक व्यक्ती देशाला फसवित होती. यावेळी त्याने दाखविलेली स्वप्ने खोटी होती. मात्र निवडणुकीनंतर भाजपाने दाखविलेली स्वप्ने, घोषणा हवेत विरली. राज्य सरकारने राज्यातील २४ नगरपालिकेतील १७ हजार व्यापार्‍यांचा ३ हजार कोटीचा एलबीटी माफ केला आहे. या सरकारच्या १७ महिन्याच्या काळात ८ मंत्र्यांनी घोटाळे केले आहेत. सरकारला येणार्‍या पावसाळी अधिवेशनात शेतकर्‍यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी धारेवर धरणार असल्याचे सांगून आपला हक्क मिळविण्यासाठी त्यांना रस्त्यावर फिरू देऊ नका, रूम्हणे हातात घेवून सळो की, पळो करून सोडा असे आवाहन त्यांनी केले.

'वर्षा'वर गाय घेऊन जाणार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, की आम्ही शेतकरी विरोधी नाही, मी पाच पिढय़ांचा शेतकरी आहे. मलाही गाईचे दूध काढता येते, मात्र फक्त बसण्याची अडचण आहे. मी येणार्‍या काळात वर्षा बंगल्यावर गाय घेऊन जाणार आहे. त्यांना बसणे नाही म्हणून टेबलावर गाय उभी करुन मुख्यमंत्र्यांकडून दुध काढून घेणार असल्याचे मुंढे यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला होता.