शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
2
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
3
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
4
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
5
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
6
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
7
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
8
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
9
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
10
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
11
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
12
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
14
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
15
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
16
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
17
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
18
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
19
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
20
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप

या, मुख्यमंत्र्यांच्या मिशनमध्ये घ्या ‘सहभाग’

By admin | Updated: August 27, 2016 04:37 IST

राज्यातील एक हजार खेड्यांचा चेहरामोहरा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बदलविणारे जे मिशन जाहीर केले आहे

यदु जोशी,

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एक हजार खेड्यांचा चेहरामोहरा खासगी कंपन्यांच्या सहभागातून बदलविणारे जे मिशन जाहीर केले आहे त्यात राज्यातील कोणत्याही व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे केवळ सरकार आणि विविध उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) होणारे मिशन नाही. त्यात एनजीओ असतीलच; पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल उद्घाटन झालेल्या ‘सहभाग’ या पोर्टलवर जाऊन कोणीही त्यात सहभागी होऊ शकेल. हजार खेड्यांच्या आमूलाग्र विकासासाठी आपल्याला निधी द्यायचा असेल, आपल्याकडील कौशल्याचा उपयोग करून द्यायची इच्छा असेल वा स्वयंसेवक म्हणूनही झोकून देण्याची तयारी असेल तर ‘सहभाग’वर तुम्हाला नोंदणी करता येईल. समाजासाठी वेगळे काही करून दाखविण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी आता तरुणाईसह सर्वांना उपलब्ध करून दिली आहे. या हजार गावांमध्ये प्रत्येकी एक व्हिलेज एक्झिक्युटीव्ह आॅफिसर (व्हीईओ) म्हणजे ग्राम कार्यकारी अधिकारी नेमण्यात येईल. विकासाच्या सर्व योजनांमध्ये समन्वय, अंमलबजावणी यावर तो लक्ष ठेवेल. ग्रामविकासासाठी समर्पित भावनेने काम करण्याची तयारी असलेल्यांना त्यासाठी संधी दिली जाईल. आयआयटी मुंबईच्या माध्यमातून आयआयटीयन्सची मोठी फळी आज ‘सी-तारा’च्या माध्यमातून गावागावांत अभिनव कल्पना राबवित असते. या तरुणाईची सांगड मुख्यमंत्र्यांच्या मिशनशी घालण्याची तयारी प्रा. मिलिंद सोहोनी यांनी या बैठकीत दर्शविली. नामवंत शैक्षणिक संस्था व स्थानिक अभियांत्रिकी कॉलेजांना या मिशनमध्ये सहभागी करून घेण्याची सूचना प्रख्यात अणुशास्रज्ञ अनिल काकोडकर यांनी केली. या मिशनची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाली तर ते ग्रामविकासाचे पर्यायी मॉडेलच ठरेल, असा विश्वास प्रख्यात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी व्यक्त केला. >रॉनी स्क्रूवालांचे मॉडेलस्वदेश फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला आणि त्यांच्या पत्नी झरिना यांनी रायगड जिल्ह्यात अनेक गावे दत्तक घेऊन विकासाची कामे हाती घेतली असून, प्रत्येक गावात एक व्हिलेज एक्झिक्युटीव्ह आॅफिसर (व्हीईओ) म्हणजे ग्राम कार्यकारी अधिकारी नेमला आहे. याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या मिशनमध्ये असे व्हीईओ नेमण्यात येणार आहेत.>रिलायन्स जिओचे नेटवर्कहजार खेड्यांच्या विकासाचे संनियंत्रण करण्यासाठी मंत्रालयात विशेष कक्ष उभारण्यात येणार असून, त्यासाठीचे डिजिटल सेंटर हे रिलायन्स जिओ उभारून देणार आहे. याशिवाय आमचे राज्यभरातील डिजिटल नेटवर्क २४ तास या मिशनसाठी उपलब्ध करून दिले जाईल.- निखिल मेस्वानी, कार्यकारी संचालक, रिलायन्स इंडस्ट्रिज लि.>बिर्ला म्हणाल्या, ३०० गावांची जबाबदारी आमची दानशूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या बिर्ला उद्योग समूहाच्या राजश्री बिर्ला यांनी, ‘एक हजार गावांपैकी ३०० गावांच्या विकासाची जबाबदारी आमची’ असा शब्द मुख्यमंत्र्यांबरोबरच्या कालच्या बैठकीत दिला तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात या घोषणेचे स्वागत करण्यात आले.>मंत्रालयात त्यांचे येणे विकासात हातभारासाठीबड्या उद्योगपतींकडील अधिकारी मंत्रालयात वर्षानुवर्षे फिरताना दिसतात ती आपापल्या कंपन्यांची कामे घेऊन. मात्र, गुरुवारी दिग्गज उद्योगपतींची मंत्रालयात मांदियाळी होती ती राज्याच्या विकासात हातभार लावण्यासाठी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ते आले होते. प्रगतीच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी मंत्रालयात इतक्या सन्मानाने आम्हाला आधी कधी बोलविले गेले नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.