शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भार्इंदरपर्यंत मेट्रो रेल्वे नेणार

By admin | Updated: March 30, 2017 04:41 IST

वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे

मुंबई : वसई-मीराभार्इंदर असा जलवाहतूक प्रकल्प उभारण्यात येईल, मुंबईतील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा विस्तार दक्षिणेकडे विमानतळापर्यंत तर उत्तरेकडे मीरा-भार्इंदरपर्यंत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांनी आज विधानसभेत जाहीर केले. मुंबईत मेट्रोचे मेट्रो ३, २ अ, २ ब, ४, ७ हे प्रकल्प सुरू आहेत. १७२ किमीपर्यंत प्रस्तावित असलेल्या मेट्रोचा विस्तार २०० किमीपर्यंत होणार आहे. मेट्रो प्रकल्पामध्ये डीएनएनगर ते दहिसर ही मेट्रो २ आहे आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व ही मेट्रो ७ आहे. या मार्गाला दक्षिण बाजूकडे विमानतळापर्यंत तर उत्तर बाजूकडे मीराभार्इंदरपर्यंत नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कुलाबा-सिप्झ मेट्रो ३ आणि डीएननगर ते मंडाले मेट्रो २ ब, वडाळा-घाटकोपर कासरवडवली मेट्रो ४, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५, स्वामी समर्थनगर - विक्रोळी मेट्रो ६ या सगळ्यांचं इंटिग्रेशन मेट्रो प्रकल्पाशी झाले असून यामुळे शहरातील कोणत्याही भागापासून कोणत्याही भागापर्यंत पोहोचणे सहज शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो भाग २ दहिसर पूर्व डीएनएनगर १८.५० किमी लांबीच्या मार्गिकेच्या प्रकल्पासाठी ६४१० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. रेल्वे लाइन ७ अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व १६.५० किमीच्या प्रकल्पासाठी ६२०८ कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प २०१९ पर्यंत पूर्ण होणार आहेत. मेट्रो २ ब डीएननगर-वांद्रे-मानखुर्द-मंडाले या २३ किमीच्या लांबीच्या प्रकल्प १०,९८६ कोटी रुपये तर मेट्रो मार्ग ४ वडाळा-मुलुंड-ठाणे-कासारवडवली ३२ किमीच्या प्रकल्पाची प्रस्तावित किंमत १४ हजार ५४९ कोटी रुपये आहे. दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन झाले असून निविदाप्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी) मुख्यमंत्र्यांनी अनुभवला होता लोकलचा प्रवासमीरा रोडवरून आपणही एकदा लोकलने मुंबईत आलो होतो, अशी आठवण मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली. ते म्हणाले की, सकाळी साडेआठच्या सुमारास मी मीरारोडला होतो. लोकल आल्यानंतर स्टेशनवरील सुमारे तीन हजार प्रवासी ती प्लॅटफॉर्मवर यायच्या आतच लोकलमध्ये घुसले. मी देखील कसाबसा आत शिरकाव केला. दादर येईपर्यंत मला हात देखील खाली करता आला नाही. स्वत:च्या हाताला खाज आली तर स्वत:चा हात देखील खाजवू शकत नव्हतो इतकी गर्दी होती. मुख्यमंत्र्यांच्या या अनुभवकथनाने सभागृहात हशा पिकला.