शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी बाटल्यांच्या अवैध धंद्याला ऊत

By admin | Updated: March 2, 2017 00:51 IST

पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे.

दीपक जाधव,

पुणे- पाणी बॉटल, २० लिटरचे जार यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पाणी शुद्ध करण्याची योग्य प्रक्रिया पार न पाडता पाणी बॉटल व जार सीलबंद करून, विक्रीसाठी बाजारात आणले जात आहे. हडपसर, सोलापूर रोड, वाघोली, कोंढवा, हिंजवडी, चाकण, आळंदी रोड आदी परिसरांमध्ये अनधिकृतपणे त्याचे उत्पादन सुरू आहे. दुकानदारांना या बाटल्या व जार स्वस्तामध्ये उपलब्ध करून दिले जात असल्याने त्यांच्याकडूनही त्यालाच पसंदी दिली जात आहे.उन्हाचा कडाका वाढू लागल्या बरोबरच पाणी बॉटल, २० लिटरचे जार यांच्या मागणीमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. बाटलीबंद पाण्यावर लोकांचा सर्वाधिक विश्वास आहे. हॉटेल, पाणपोई याठिकाणचे पाणी न पिता बाटलीबंद पाणी पिण्याकडे नागरिकांचा कल असतो; मात्र बाटलीबंद पाण्याच्या व्यवसायामध्ये चुकीच्या प्रवृत्तींनी शिरकाव केल्याने, या विश्वासाला तडा जात आहे. टँकर, बोअरिंग, विहिरींमधील पाण्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया न करता, ते सीलबंद करून विक्रीसाठी आणले जात आहे. पाणी बॉटल, जार यांचे उत्पादन करण्यासाठी पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करणारे प्लांट उभारणे, त्या प्लांटला अन्न व औषध प्रशासन (एफडीआय); तसेच बीएसआय मार्क मिळविणे आवश्यक असते. पाणी योग्यप्रकारे शुद्ध केले जाऊन त्याचा दर्जा चांगला, योग्य असल्याची तपासणी करूनच त्यांना पाणी बॉटल उत्पादनाचा परवाना दिला जातो; मात्र शहराच्या विविध भागांमध्ये एफडीआय व बीएसआय मार्कची कोणतीही परवानगी न घेता, पाणी शुद्धीकरण करण्याचे प्लांट उघडण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे उघडण्यात आलेल्या प्लांटमध्ये पाण्यावर प्रक्रिया करण्यास फारसा खर्च केला जात नसल्याने त्यांच्याकडून अगदी स्वस्तामध्ये त्या दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत. >ग्राहकांनी खबरदारी घ्यावीपाणी योग्यप्रकारे शुद्ध न करता त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. हे प्रकार थांबविण्याची जबाबदारी ग्राहकांवर आहे. आपण विकत घेतलेली बॉटल, पाण्याचे जार यांची कंपनी, त्यावरील बीएसआय मार्क आदी बाबींकडे लक्ष द्यावे. कंपन्यांनी २० लिटरच्या जारची मागणी नोंदविताना संबंधित प्लांटला भेट देऊन तिथे योग्य प्रकारे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया पार पाडली जाते का, याची पाहणी करावी. - ललित गलांडे, अध्यक्ष, पुणे वॉटर बॉटल अँड जार असोसिएशन>प्लांटमध्ये सुसज्ज लॅब असणे आवश्यकपाणी बॉटल, जार निर्मिती करणाऱ्या प्लांटमध्ये शुद्ध केलेल्या पाण्याची नियमित तपासणी करण्यासाठी सुसज्ज लॅब असणे आवश्यक आहे. या लॅबमधून दररोज पाण्याची गुणवत्ता नियमित तपासली जाणे आवश्यक आहे; मात्र अनेक प्लांटमध्ये या लॅब नसल्याचे दिसून येत आहे.>प्रशासनाचे दुर्लक्ष अन्न व औषध प्रशासन (एफडीए) तसेच बीआयएस मार्क यांची परवानगी न घेता, मोठ्या प्रमाणात पाणी बॉटल व २० लिटरचे जार बेकायदेशीरपणे बाजारात आणले जात आहेत; मात्र प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने खुलेआमपणे या बाटल्या व जार बाजारात विकले जात आहेत. बेकायदेशीर प्लांट शोधून त्यांच्यावर धडक कारवाई होणे आवश्यक असल्याची मागणी पुणे वॉटर बॉटल अँड जार असोसिएशनकडून व्यक्त करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी असोसिएशनच्या वतीने पुढाकार घेऊन या बेकायदेशीर प्लांटवर छापे टाकण्यात आले होते.>बाजारामध्ये १ लिटरची पाणी बॉटल २० रुपयांना विकली जाणारी, दुकानदारांना अवघ्या ४ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे.या बॉटलची मोठी आॅर्डर दिल्यास हा दर आणखी कमी केला जातो. अनेक कंपन्या व व्यावसायिक ठिकाणांना नियमितपणे पिण्याच्या पाण्याचे २० लिटरचे जार पुरविले जातात.या जारमधील पाणीही योग्य प्रकारे शुद्ध न करता पुरविले जात आहे. जारद्वारे केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ५० टक्के पाणी योग्य प्रकारे शुद्ध केले जात नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.