शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

अपघात टाळण्यासाठी पुरेशी खबरदारी घ्या!

By admin | Updated: May 20, 2014 03:40 IST

गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी,

मुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये नौदलाच्या बोटींचे सातत्याने अपघात होत असून, हे अपघात टाळण्यासाठी नौदलाच्या अधिकारी आणि जवानांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, अशा सूचना नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल आर.के. धोवन यांनी दिल्या आहेत. नौदलप्रमुख झाल्यावर पश्चिम नौदलतळाला त्यांनी पहिल्यांदाच भेट दिली. धोवन हे १८ आणि १९ असे दोन दिवस मुंबई दौर्‍यावर आहेत. सोमवारी आयएनएस शिक्रा बोटीवर संचालनाचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सागरीसीमेवरील आव्हाने मोठी असून, या आव्हानांचा सामना करण्यासाठी नौदलाचे सामर्थ्य वाढवण्याचे काम सुरू आहे. सामर्थ्य वाढवणे आणि अपघात टाळण्यासाठी नौदलाकडून प्राधान्याने लक्ष दिले जाईल. हे सांगतानाच सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वदेशी निर्मितीवर आमचा भर राहणार असून, विक्रमादित्य, तेग आणि शिवालिक श्रेणीच्या विमानवाहक युद्धनौका, चक्र आण्विक पाणबुडी आणि काही छोट्या-मोठ्या मध्यम आकाराच्या बोटींची स्वदेशी निर्मितीचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या निर्मितीला वेळ लागणार असेल आणि नौदलाची गरज असेल तर वेळ पडल्यास तंत्रज्ञान आयातही केले जाईल. नौदलात काम करणारा प्रत्येक जण आपल्या कामात निपुण असून, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास ते सज्ज असल्याचेही नौदलप्रमुखांनी सांगितले. या वेळी विक्रांत लिलावाबाबत नौदलाची भूमिका काय, असे विचारले असता कोर्टाच्या आदेशाचे नौदल पालन करेल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)