शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्याबाबत ठोस भूमिका घ्या, उच्च न्यायालयाची राज्य सरकारला सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 06:48 IST

चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यासंदर्भात कायदेशीर तरतूद नसतानाही प्रेक्षकांना बंदी घातली जाते. वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा रुल्सनुसार, चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे. गेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना...

मुंबई : मल्टिप्लेक्सच्या संघटनांकडून सूचना घेऊन प्रेक्षकांना चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ आणण्याबाबत ठोस भूमिका घ्या, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी केली. प्रेक्षकांना बाहेरील खाद्य पदार्थ चित्रपटगृहांत नेण्याबाबत याचिकाकर्ते जनेंद्र बक्सी यांनी काही सूचना गुरुवारी न्यायालयात सादर केल्या. त्यांचा विचार करण्याची सूचना न्या. आर. एम. बोर्डे व न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठाने गृहविभागाला केली. चित्रपटगृहांत बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी घालण्यासंदर्भात कायदेशीर तरतूद नसतानाही प्रेक्षकांना बंदी घातली जाते. वास्तविक, महाराष्ट्र सिनेमा रुल्सनुसार, चित्रपटगृहांत खाद्यपदार्थ विकण्यास मनाई आहे, असे याचिकेत म्हटले आहे. गेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांना यासंबंधी सूचना करण्याचे न्यायालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार वकील आदित्य प्रताप यांनी सूचना सादर केल्या. दरम्यान, एफआयसीसीआय या मल्टिप्लेक्स मालकांच्या संघटनांनी मध्यस्थी याचिका केली आहे. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितले की, राज्य सरकार सर्व पक्षांची बाजू ऐकून निर्णय घेण्यास तयार आहे. न्यायालयाने सरकारचे म्हणणे मान्य करत दोन आठवड्यांनी सुनावणी ठेवली आहे.