शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
5
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
6
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
7
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
8
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
9
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
10
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
11
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
12
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
13
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
14
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
15
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
16
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
17
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
18
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
19
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
20
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे

पावसाळ्यात घ्या संतुलित आहार

By admin | Updated: June 29, 2016 02:37 IST

पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते. पावसाळ््यात चटपटीत, खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण या पदार्थांपेक्षा घरातील शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे. त्यामुळे पावसाळ््यात होणाऱ्या कावीळ, डायरियासारख्या आजारांना टाळता येते. पावसाळ््यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी चिंच, मेथी, लसूण, कांदा या पदार्थांचे सेवन करावे. आले आणि लसणीमध्ये असणाऱ्या सल्फरमुळे विषाणूंपासून संरक्षण मिळते. पावसाळ््यात हवेत थंडावा असल्यामुळे दिवसभरात तहान जास्त लागत नाही, पण तरीही दिवसातून १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाऊस पडत असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भजी, चाटच्या स्टॉलकडे सर्रास सर्वांचे पाय वळतात. पावसात भिजत हे पदार्थ खाणे लोक एन्जॉय करतात, पण असे एन्जॉय करणे टाळावे. यापेक्षा घरी शिजवलेले पदार्थ खावेत. मधुमेही रुग्णांनी विशेष करून पावसाळ््यात काळजी घेतली पाहिजे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीराला ग्लुकोजचे विघटन करून त्यापासून शक्ती निर्माण करता येत नाही. त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते व शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मधुमेही व्यक्ती अनेक आजारांना बळी पडतात. त्यामुळे मधुमेहींनी पावसाळ््यात खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत, असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)