शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

पावसाळ्यात घ्या संतुलित आहार

By admin | Updated: June 29, 2016 02:37 IST

पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते.

मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर वातावरणातील बदलांमुळे आहारातही बदल करणे आवश्यक असते. पावसाळ््यात चटपटीत, खमंग पदार्थ खाण्याची इच्छा होते, पण या पदार्थांपेक्षा घरातील शिजवलेले अन्न खाल्ले पाहिजे. त्यामुळे पावसाळ््यात होणाऱ्या कावीळ, डायरियासारख्या आजारांना टाळता येते. पावसाळ््यात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी चिंच, मेथी, लसूण, कांदा या पदार्थांचे सेवन करावे. आले आणि लसणीमध्ये असणाऱ्या सल्फरमुळे विषाणूंपासून संरक्षण मिळते. पावसाळ््यात हवेत थंडावा असल्यामुळे दिवसभरात तहान जास्त लागत नाही, पण तरीही दिवसातून १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाऊस पडत असताना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भजी, चाटच्या स्टॉलकडे सर्रास सर्वांचे पाय वळतात. पावसात भिजत हे पदार्थ खाणे लोक एन्जॉय करतात, पण असे एन्जॉय करणे टाळावे. यापेक्षा घरी शिजवलेले पदार्थ खावेत. मधुमेही रुग्णांनी विशेष करून पावसाळ््यात काळजी घेतली पाहिजे. मधुमेह झालेल्या व्यक्तीच्या शरीराला ग्लुकोजचे विघटन करून त्यापासून शक्ती निर्माण करता येत नाही. त्यामुळे शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते व शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मधुमेही व्यक्ती अनेक आजारांना बळी पडतात. त्यामुळे मधुमेहींनी पावसाळ््यात खाण्याच्या वेळा पाळल्या पाहिजेत, असे मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)