शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

विकास आराखडा तयार करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: April 22, 2015 04:20 IST

विकास आराखड्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे

मुंबई : विकास आराखड्याच्या नावाखाली करदात्यांच्या पैशांची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. प्रथम फ्रान्स, मग सिंगापूरच्या कंपन्या असा प्रवास करीत शेवटी आपल्याच अधिकाऱ्यांकडून आराखडा बनविण्यात आला. मात्र या निरर्थक आराखड्यासाठी कोट्यवधींची उधळण करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांंवर कारवाई व्हायला हवी, असे राज यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. हा निरर्थक डीपी रद्द होण्यामागे श्रेय सजग मराठी माणसाचेच आहे, असेही त्यांनी या वेळेस स्पष्ट केले.प्रस्तावित विकास आराखडा रद्द करण्याच्या राज्य शासनाच्या घोषणेनंतर राज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. ते म्हणाले की, विकास आराखड्यातील गंभीर चुका पाहता याआधीच आराखड्याला केराची टोपली दाखवणे अपेक्षित होते. परंतु उशिरा का हाईना तो रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. मराठी माणसाच्या रेट्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे हा निरर्थक आराखडा हद्दपार करण्याचे श्रेय सजगतेने विरोध करणाऱ्या मराठी माणसाचे आहे.