शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा !

By admin | Updated: November 8, 2015 01:09 IST

राज्यातील मेडिकल महाविद्यालयातील प्रवेश प्रक्र्रियेत घोटाळा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाला सुमारे दोन वर्षे होत

मुंबई : राज्यातील मेडिकल महाविद्यालयातील प्रवेश प्रक्र्रियेत घोटाळा करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाला सुमारे दोन वर्षे होत आली, तरी वैद्यकीय शिक्षण विभागाने संबंधित अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई केलेली नाही. या अधिकाऱ्यांवर कारवाई करून सर्वोच्च न्यायालयाचा मान राखावा, अशी मागणी सिटिझन फोरम संघटनेने शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.राज्यात २0१२-१३ या शैक्षणिक वर्षात मेडिकल महाविद्यालयातील प्रवेशाचा मोठा घोटाळा उघडकीस आला. न्यायासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने पालकांना न्याय देत, २0 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे, घोटाळा रोखण्यात कामचुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.मेडिकल महाविद्यालयातील घोटाळ्याचे प्रकरण प्रलंबित असतानाच राज्यातील अभियांत्रिकी आणि फार्मसी महाविद्यालयांना मान्यता मिळविण्यासाठी खोटी माहिती सादर केल्याबाबतची माहिती सिटिझन फोरमने डीटीई, प्रवेश नियंत्रण समिती आणि शिक्षण शुल्क समितीकडे सादर केली आहे, तसेच राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा नसल्याचे, सरकारने नेमलेल्या समित्यांच्या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. असे असूनही अशा महाविद्यालयांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देण्यात येत असल्याबद्दल, सिटिझन फोरम फॉर सॅन्क्टिटी इन एज्युकेशन सीस्टिम या संघटनेचे वैभव नरवडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.