शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई

By admin | Updated: October 18, 2016 05:27 IST

महापालिकांना एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टच्या नियमांचे पालन न करताच फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

मुंबई : दिवाळीच्या सणात फटाक्यांमुळे आग लागून जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह राज्यातील सर्व महापालिकांना एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टच्या नियमांचे पालन न करताच फटाक्यांचा साठा करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.‘आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना न आखताच रहिवासी क्षेत्रात फटाक्यांचा साठा केल्याने अनेक वेळा आग लागते. त्यामध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी होते. दिवाळीदरम्यान हे प्रमाण वाढते. संपूर्ण देशात अशा दुर्घटना घडत असतात. त्यामुळे राज्य सरकारने व महापालिकांनी बेकायदेशीरपणे फटाक्यांचा साठा करणाऱ्यांवर कारवाई करावी,’ असे न्या. व्ही.एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले.नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत लासुरे यांनी नाशिकमध्ये बेकायदेशीरपणे फटाके विकणाऱ्या व साठा करणाऱ्यांवर सरकारला आणि महापालिकेला कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याचिकेनुसार, एक्सप्लोसिव्ह अ‍ॅक्टनुसार फटाक्यांचा साठा रहिवासी क्षेत्रात केला जाऊ शकत नाही. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखून परवाना मिळवावा लागतो. नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या फटाके विकण्यात येत आहेत. वास्तविक फटाके खुल्या मैदानावर विकले पाहिजेत. त्यावर नाशिक महापालिकेने बेकायदेशीररीत्या फटाके विकणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द केला असून पुढील कारवाई पोलिसांनी करायची आहे, असे खंडपीठाला सांगितले.‘सरकारने व महापालिकांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याऐवजी कारवाई करावी. राज्य सरकारने आतापर्यंत काय कारवाई केली हे पुढील सुनावणीला सांगावे. ही याचिका केवळ नाशिक महापालिकेपुरतीच मर्यादित नाही. आम्ही राज्यातील सर्व महापालिकांना कारवाई करण्यास सांगत आहोत,’ असेही खंडपीठाने सुनावणीत स्पष्ट केले.या वेळी उच्च न्यायालयाने दुकानदारांनाही सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)>शिक्षकांचे मानले आभारसरकारने व महापालिकांनी रहिवासी क्षेत्रात फटक्यांचा साठा करण्यास परवानगी देऊ नये. खुल्या मैदानात फटाक्यांची विक्री व साठा करण्याची परवानगी द्यावी. त्यामुळे त्यावर लक्ष ठेवणे सहज शक्य होईल, असे म्हणत पुढील सुनावणी २५ आॅक्टोबरला ठेवली.‘अलीकडे तिसरी-चौथीतील मुले फटाके वाजवण्यास नकार देतात. निदान मुंबईत तरी असे चित्र आहे. विद्यार्थ्यांना याची माहिती देणाऱ्या शिक्षकांचे आभार मानले पाहिजेत,’ असे खंडपीठाने म्हटले.