शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

घोटाळेबाज पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: November 13, 2014 00:59 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागातील ३४ घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यासाठी शासनाला शेवटची संधी म्हणून आणखी तीन महिन्यांची मुदत

हायकोर्ट : शासनाला तीन महिन्यांची मुदतवाढनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम विभागातील ३४ घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यासाठी शासनाला शेवटची संधी म्हणून आणखी तीन महिन्यांची मुदत वाढवून दिली आहे तसेच यानंतर कोणत्याही प्रकारची सबब ऐकून वेळ दिला जाणार नाही, अशी तंबी दिली आहे.नागपूर कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे सार्वजनिक बांधकाम नागपूर प्रादेशिक विभागात २००७ ते २०१० या कालावधीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मोहन कारेमोरे यांचा मध्यस्थी अर्ज आहे. याप्रकरणावर आज, बुधवारी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर विभागीय कारवाई करण्यासाठी शासनाला यापूर्वी तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. परंतु, शासनाने कारवाईची प्रक्रिया पूर्ण केली नाही. आज शासनाने पुन्हा तीन महिन्यांचा वेळ देण्याची विनंती केली. यामुळे न्यायालयाने शासनाला कडक शब्दांत खडसावून शेवटची संधी म्हणून वेळ वाढवून दिला. चौकशी अधिकारी के. डी. डोईफोडे यांनी गैरव्यवहारात सामील ३४ अधिकाऱ्यांवर २८७ आरोप ठेवले आहेत. ४ फेब्रुवारी २०१४ रोजी चौकशी अहवाल सादर करण्यात आला आहे. चौकशीनंतरची आवश्यक कार्यवाही संपवून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने सुरुवातीला सहा महिन्यांचा वेळ मागितला होता. चौकशीचा अवाका मोठा असून आरोपांची काळजीपूर्वक तपासणी करणे आवश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे होते. परंतु, न्यायालयाने तीन महिन्यांचाच वेळ मंजूर केला होता. रामगिरी, देवगिरी व रविभवनातील मंत्र्यांच्या निवासस्थान देखभालीसाठी अनेक खोट्या निविदा काढण्यात आल्या आहेत.