शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

६० जागा घ्या, नाहीतर घरी जा!

By admin | Updated: January 22, 2017 05:08 IST

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने

- यदु जोशी, मुंबई

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने शनिवारची युतीच्या बोलणीची बैठक निष्फळच ठरली नाही, तर युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली. ही बैठक चहापाण्यासह केवळ २० मिनिटे चालली. भाजपाचे नेते ११४ जागांची यादी घेऊनच गेले होते. तथापि, शिवसेनेने केवळ साठच जागा देऊ केल्याने यादी न देताच बैठक आटोपली. ‘तुम्ही आमचा अपमान करायला आम्हाला बोलावले का, असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी खा. अनिल देसाई यांना केला. बैठकीत जोरदार वादावादी व खडाजंगीच झाली आणि दोन्ही पक्षांचे नेते तावातावाने बाहेर पडले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वाट्टेल तशी टीका करायची, आमच्या पक्षाला माफियांचा म्हणायचे. हे धंदे बंद झाले नाहीत तर युती कशी होईल? तुमची ताकद पाहूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे, असे शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी शेलार यांना ठणकावल्याचे कळते. त्यावर विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनी, तुम्ही ६०वर अडणार असाल तर पुढे चर्चाच होऊ शकत नाही, असे सुनावले. गेल्या काही वर्षांत शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद वाढली आहे, आमच्याजवळ आकडेवारीचा आधार आहे. भावनिक बोलून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, असा पलटवार शेलार यांनी केल्याचेही समजते. बैठकीतून बाहेर पडलेले खा. अनिल देसाई आणि शेलार यांनी सांगितले की, बैठकीतील चर्चेची माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना देऊ आणि तेच काय तो निर्णय घेतील. त्यामुळे युतीचा चेंडू पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. शिवसेनेचा यू टर्न, पण चर्चेत ताठर‘युतीबाबत चर्चा होणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच काय ते जाहीर करावे,’ अशी भूमिका आ. अनिल परब यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. या भूमिकेवर शिवसेनेने काही तासांतच ‘यू टर्न’ घेत चर्चेची तयारी दर्शविली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री फोनवर चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा बोलणी सुरू करावी, असे ठरले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून विनोद तावडे यांनी खा. देसाई यांना आज दुपारी फोन केला आणि ‘रंगशारदा’मध्ये चर्चेला बसण्याचे ठरले. चर्चेबाबत ‘यू टर्न’ घेणाऱ्या शिवसेनेने भाजपाला जागा सोडण्याबाबत मात्र ताठरपणा कायम ठेवला. नेमके काय बिघडले?२०१२च्या महापालिका निवडणूक निकालाच्या आधारे जागांचे वाटप व्हावे, असे सेनेला वाटते. भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे असे आहे की, तेव्हा युती होती. त्यामुळे ते दोघांचे एकत्रित यश होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दोघे वेगळे लढल्याने दोघांची वेगवेगळी ताकद कळलेली आहे. त्यामुळे आता युती करायची असेल तर विधानसभेचा आधार घ्या. सेनेच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपावाले आम्हाला आमच्याकडील विद्यमान ४० जागा मागत आहेत, त्या देणे शक्यच नाही.