शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

६० जागा घ्या, नाहीतर घरी जा!

By admin | Updated: January 22, 2017 05:08 IST

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने

- यदु जोशी, मुंबई

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने शनिवारची युतीच्या बोलणीची बैठक निष्फळच ठरली नाही, तर युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली. ही बैठक चहापाण्यासह केवळ २० मिनिटे चालली. भाजपाचे नेते ११४ जागांची यादी घेऊनच गेले होते. तथापि, शिवसेनेने केवळ साठच जागा देऊ केल्याने यादी न देताच बैठक आटोपली. ‘तुम्ही आमचा अपमान करायला आम्हाला बोलावले का, असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी खा. अनिल देसाई यांना केला. बैठकीत जोरदार वादावादी व खडाजंगीच झाली आणि दोन्ही पक्षांचे नेते तावातावाने बाहेर पडले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वाट्टेल तशी टीका करायची, आमच्या पक्षाला माफियांचा म्हणायचे. हे धंदे बंद झाले नाहीत तर युती कशी होईल? तुमची ताकद पाहूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे, असे शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी शेलार यांना ठणकावल्याचे कळते. त्यावर विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनी, तुम्ही ६०वर अडणार असाल तर पुढे चर्चाच होऊ शकत नाही, असे सुनावले. गेल्या काही वर्षांत शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद वाढली आहे, आमच्याजवळ आकडेवारीचा आधार आहे. भावनिक बोलून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, असा पलटवार शेलार यांनी केल्याचेही समजते. बैठकीतून बाहेर पडलेले खा. अनिल देसाई आणि शेलार यांनी सांगितले की, बैठकीतील चर्चेची माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना देऊ आणि तेच काय तो निर्णय घेतील. त्यामुळे युतीचा चेंडू पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. शिवसेनेचा यू टर्न, पण चर्चेत ताठर‘युतीबाबत चर्चा होणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच काय ते जाहीर करावे,’ अशी भूमिका आ. अनिल परब यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. या भूमिकेवर शिवसेनेने काही तासांतच ‘यू टर्न’ घेत चर्चेची तयारी दर्शविली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री फोनवर चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा बोलणी सुरू करावी, असे ठरले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून विनोद तावडे यांनी खा. देसाई यांना आज दुपारी फोन केला आणि ‘रंगशारदा’मध्ये चर्चेला बसण्याचे ठरले. चर्चेबाबत ‘यू टर्न’ घेणाऱ्या शिवसेनेने भाजपाला जागा सोडण्याबाबत मात्र ताठरपणा कायम ठेवला. नेमके काय बिघडले?२०१२च्या महापालिका निवडणूक निकालाच्या आधारे जागांचे वाटप व्हावे, असे सेनेला वाटते. भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे असे आहे की, तेव्हा युती होती. त्यामुळे ते दोघांचे एकत्रित यश होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दोघे वेगळे लढल्याने दोघांची वेगवेगळी ताकद कळलेली आहे. त्यामुळे आता युती करायची असेल तर विधानसभेचा आधार घ्या. सेनेच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपावाले आम्हाला आमच्याकडील विद्यमान ४० जागा मागत आहेत, त्या देणे शक्यच नाही.