शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

६० जागा घ्या, नाहीतर घरी जा!

By admin | Updated: January 22, 2017 05:08 IST

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने

- यदु जोशी, मुंबई

‘मुंबई महापालिकेसाठी ११४ जागा कशाच्या आधारे मागता? ६० जागा घ्या, अन्यथा युती तुटली म्हणून समजा,’ या शब्दांत शिवसेनेने भाजपाला वाटाण्याच्या अक्षता लावल्याने शनिवारची युतीच्या बोलणीची बैठक निष्फळच ठरली नाही, तर युती होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आली. ही बैठक चहापाण्यासह केवळ २० मिनिटे चालली. भाजपाचे नेते ११४ जागांची यादी घेऊनच गेले होते. तथापि, शिवसेनेने केवळ साठच जागा देऊ केल्याने यादी न देताच बैठक आटोपली. ‘तुम्ही आमचा अपमान करायला आम्हाला बोलावले का, असा सवाल मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी खा. अनिल देसाई यांना केला. बैठकीत जोरदार वादावादी व खडाजंगीच झाली आणि दोन्ही पक्षांचे नेते तावातावाने बाहेर पडले, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ‘उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर वाट्टेल तशी टीका करायची, आमच्या पक्षाला माफियांचा म्हणायचे. हे धंदे बंद झाले नाहीत तर युती कशी होईल? तुमची ताकद पाहूनच आम्ही प्रस्ताव दिला आहे, असे शिवसेनेचे आ. अनिल परब यांनी शेलार यांना ठणकावल्याचे कळते. त्यावर विनोद तावडे, प्रकाश मेहता यांनी, तुम्ही ६०वर अडणार असाल तर पुढे चर्चाच होऊ शकत नाही, असे सुनावले. गेल्या काही वर्षांत शिवसेनेपेक्षा भाजपाची ताकद वाढली आहे, आमच्याजवळ आकडेवारीचा आधार आहे. भावनिक बोलून तुम्ही आम्हाला मूर्ख बनवू शकत नाही, असा पलटवार शेलार यांनी केल्याचेही समजते. बैठकीतून बाहेर पडलेले खा. अनिल देसाई आणि शेलार यांनी सांगितले की, बैठकीतील चर्चेची माहिती आम्ही वरिष्ठ नेत्यांना देऊ आणि तेच काय तो निर्णय घेतील. त्यामुळे युतीचा चेंडू पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे. शिवसेनेचा यू टर्न, पण चर्चेत ताठर‘युतीबाबत चर्चा होणार नाही. आता मुख्यमंत्र्यांनीच काय ते जाहीर करावे,’ अशी भूमिका आ. अनिल परब यांनी शुक्रवारी जाहीर केली होती. या भूमिकेवर शिवसेनेने काही तासांतच ‘यू टर्न’ घेत चर्चेची तयारी दर्शविली. उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री फोनवर चर्चा झाली आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुन्हा बोलणी सुरू करावी, असे ठरले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरून विनोद तावडे यांनी खा. देसाई यांना आज दुपारी फोन केला आणि ‘रंगशारदा’मध्ये चर्चेला बसण्याचे ठरले. चर्चेबाबत ‘यू टर्न’ घेणाऱ्या शिवसेनेने भाजपाला जागा सोडण्याबाबत मात्र ताठरपणा कायम ठेवला. नेमके काय बिघडले?२०१२च्या महापालिका निवडणूक निकालाच्या आधारे जागांचे वाटप व्हावे, असे सेनेला वाटते. भाजपाच्या नेत्यांचे म्हणणे असे आहे की, तेव्हा युती होती. त्यामुळे ते दोघांचे एकत्रित यश होते. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत दोघे वेगळे लढल्याने दोघांची वेगवेगळी ताकद कळलेली आहे. त्यामुळे आता युती करायची असेल तर विधानसभेचा आधार घ्या. सेनेच्या सूत्रांनी सांगितले की, भाजपावाले आम्हाला आमच्याकडील विद्यमान ४० जागा मागत आहेत, त्या देणे शक्यच नाही.