शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइन वादळ!

By admin | Updated: March 14, 2015 04:31 IST

स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ

पुणे : स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट झाला असून, गेल्या २४ तासांत या आजाराने राज्यात तब्बल १७ जणांचा बळी घेतला. गेल्या तीन वर्षांत एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी राज्यातील स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या २६४ वर पोहोचली आहे. यावरून राज्यात स्वाइन फ्लू रोखण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचे स्पष्ट होते.गतवर्षी डिसेंबरमध्ये राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा फैलाव झाल्यानंतर लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत आणि बळींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरूवारी दिवसभरात राज्यभरात सुमारे ११ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १ हजार संशयितांना आॅसेलटॅमीवीर औषधी देण्यात आली. १३१ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले. परिणामी लागण झालेल्यांची संख्या ३ हजार १३५ वर पोहोचली आहे. ४१० रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी ३६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली़ पूर्णपणे बरे झालेल्या १३० जणांना शुक्रवारी रुग्णालयांमधून घरी सोडण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)