शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले

By admin | Updated: August 15, 2015 00:36 IST

गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे.

मुंबई/ठाणे/पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे. आतापर्यंतची बळींची संख्या ५७८ झाली आहे तर लागण झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ८४५ वर पोहोचली आहे.१० ते १३ आॅगस्टमध्ये तब्बल १२५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १७ रुग्णांची प्रकृती अत्यव्यस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई, धुळे, पुणे, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई, रायगड, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे.२००९ मध्ये राज्यात अचाकनपणे स्वाइन फ्लूची साथ आली. त्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या वर्षात स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम होता. २०१३ व २०१४ मध्ये आजाराची तीव्रता कमी झाली होती. मात्र पुन्हा वर्षाच्या सुरुवातीला त्याने डोके वर काढले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या अवघ्या चार महिन्यांत राज्याच्या अनेक भागांत आजार फैलावला. त्यातून साडेपाच हजार नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि ५०० हून अधिक जणांचा बळी गेला. मे महिन्यात तापमानवाढीमुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठीचे पोषक वातावरण कमी झाले आणि आजाराचे रुग्ण घटले होते.दोन महिन्यांपासून पावसाळी वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ८ लाख ९९ हजार ३५८ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५९ हजार ५८३ संशयितांना औषध देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)