शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
5
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
6
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
7
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
8
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
9
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
10
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
11
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
12
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
13
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
14
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
15
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
17
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
18
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
19
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"

‘स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले

By admin | Updated: August 15, 2015 00:36 IST

गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे.

मुंबई/ठाणे/पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून नियंत्रणात असलेल्या स्वाइन फ्लूने राज्यात पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांत या आजाराने १२ जणांचा बळी घेतला तर १२५ जणांना लागण झाली आहे. आतापर्यंतची बळींची संख्या ५७८ झाली आहे तर लागण झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार ८४५ वर पोहोचली आहे.१० ते १३ आॅगस्टमध्ये तब्बल १२५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १७ रुग्णांची प्रकृती अत्यव्यस्थ असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये मुंबई, धुळे, पुणे, रत्नागिरी, ठाणे, नवी मुंबई, रायगड, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यांतील रुग्णांचा समावेश आहे.२००९ मध्ये राज्यात अचाकनपणे स्वाइन फ्लूची साथ आली. त्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या वर्षात स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम होता. २०१३ व २०१४ मध्ये आजाराची तीव्रता कमी झाली होती. मात्र पुन्हा वर्षाच्या सुरुवातीला त्याने डोके वर काढले. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या अवघ्या चार महिन्यांत राज्याच्या अनेक भागांत आजार फैलावला. त्यातून साडेपाच हजार नागरिकांना स्वाइन फ्लूची लागण झाली आणि ५०० हून अधिक जणांचा बळी गेला. मे महिन्यात तापमानवाढीमुळे स्वाइन फ्लूच्या विषाणूंसाठीचे पोषक वातावरण कमी झाले आणि आजाराचे रुग्ण घटले होते.दोन महिन्यांपासून पावसाळी वातावरणामुळे गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूच्या ‘एच १ एन १’ या विषाणूंना पोषक वातावरण निर्माण होऊ लागले आहे. आरोग्य विभागाकडून आतापर्यंत ८ लाख ९९ हजार ३५८ जणांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ५९ हजार ५८३ संशयितांना औषध देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)