शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:40 IST

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

मुंबई : राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही साथीच्या आजारांचा जोर कमी झालेला नाही. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी डेंग्यू, मलेरियामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आॅगस्ट महिन्यापर्यंत राज्यभरात स्वाइन फ्लूचे १९७ बळी गेले असून, दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती नव्या स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव नाशिक, नागपूरमध्ये आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसारख्या शहरी भागांतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले.नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३२ जण दगावले, तर नागपूर २६, पुण्यात १७, अहमदनगर १६, कोल्हापूर ९ आणि ठाण्यात ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिक आणि नागपूरमध्ये आढळलेल्या २९ हजार ७०२ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत.‘आजार अंगावर काढू नयेत’२०१७ मध्ये वर्षभरात ४२ हजार ४९२ जणांना लसीकरण करण्यात आले, तसेच २०१८ या वर्षात एक लाख २८ हजार जणांना तर जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत ४७ हजार ६०६ जणांना लसीकरण करण्यात आले. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांनीदेखील स्वत: काळजी घेत, सर्दी, ताप, घसादुखीसारखे आजार अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे राज्य संसर्गजन्य रोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू