शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

राज्यभरात स्वाइन फ्लूने घेतले १९७ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 05:40 IST

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

मुंबई : राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरीही साथीच्या आजारांचा जोर कमी झालेला नाही. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच ठिकाणी डेंग्यू, मलेरियामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. त्याचप्रमाणे, दुसरीकडे आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आॅगस्ट महिन्यापर्यंत राज्यभरात स्वाइन फ्लूचे १९७ बळी गेले असून, दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

जानेवारी ते आॅगस्ट या कालावधीत १८ लाख ६५ हजार ७०४ रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती नव्या स्वाइन फ्लू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा सर्वाधिक प्रभाव नाशिक, नागपूरमध्ये आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगरसारख्या शहरी भागांतही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले.नाशिकमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक ३२ जण दगावले, तर नागपूर २६, पुण्यात १७, अहमदनगर १६, कोल्हापूर ९ आणि ठाण्यात ८ जणांचा मृत्यू झाला. नाशिक आणि नागपूरमध्ये आढळलेल्या २९ हजार ७०२ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या आहेत.‘आजार अंगावर काढू नयेत’२०१७ मध्ये वर्षभरात ४२ हजार ४९२ जणांना लसीकरण करण्यात आले, तसेच २०१८ या वर्षात एक लाख २८ हजार जणांना तर जानेवारी ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत ४७ हजार ६०६ जणांना लसीकरण करण्यात आले. स्वाइन फ्लूचा वाढता प्रभाव लक्षात घेता, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांनीदेखील स्वत: काळजी घेत, सर्दी, ताप, घसादुखीसारखे आजार अंगावर न काढता तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे राज्य संसर्गजन्य रोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू