शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

आवक मंदावल्याने गोड फळे झाली कडू

By admin | Updated: June 20, 2014 22:11 IST

पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

राजेंद्र वाघ, शहाड - पावसाला सुरूवात झाली असली तरी गेल्या महिनाभरात वाढलेल्या तापमानामुळे बाजारपेठेत फळाची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे सध्या फळबाजार कडाडला असून फळांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वमसाान्यांसाठी गोड असणारी फळे आता कडू वाटू लागली आहेत.उन्हाळ्यात हिमाचल प्रदेश, सिमला आदी ठिकाणाहून सफरचंद येत नाहीत. त्यामुळे सध्या तरी साठवलेला माल बाजारात विक्रीसाठी येत आहे. बाहेरील देशांमधून आयात केलेली सफरचंद तब्बल २०० रुपये किलो इतका दर आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंद १५० रुपये किला दराने मिळत आहेत. डाळींब १४० रुपये, पेर १६० रुपये व संत्रा १०० रुपये किलो दराने विकली जात आहेत. शिवाय स्ट्रॉबेरी, मोसंबी व खरबूज ही फळेदेखील बाजारात उपलब्ध असली तरी ते सुद्धा ६० ते ७० रुपये किलो दराने विकली जात आहेत.सर्वच फळांच्या किंमती शंभर रुपयांच्या आसपास गेल्याने सर्वसामान्यांना फळांचा गोडवा चाखणे कठीण झाले आहे. याशिवाय फळबाजारावर अवलंबून असलेले विविध प्रक्रिया उद्योगांवरही या दरवाढीचा परिणाम झाला आहे. व्यापारी व किरकोळ विक्रेते सुद्धा बाजारातील तेजी-मंदी अर्थात परिस्थिती पाहून माल उचलतात. सध्या बाजारात मागणी जास्त असली तरी फळांची आवक कमी असल्याने फळांचे दर गगणानाल भिडले आहेत. ज्युस मिळणे झाले कठीणफळांचे दर गगनाला भिडल्याने त्याचा परिणाम ज्यूस विक्रीवर झाला आहे. सध्या कल्याण , डोंबिवली व आसपासच्या परिसरात ३० ते ३५ रुपये प्रतिग्लास ज्यूस बाजारात मिळत आहे. ज्युसचे दर वाढल्याने ज्यूस पिण्याकडे असलेला नागरिकांचा कल कमी झाला आहे. असे आहेत दर२०० रूपये - सफरचंद२०० रुपये - जरदाळू१६० रुपये - पेर१४० रुपये - डाळींब१०० रुपये -संत्रा५० रुपये - खरबूज६० रुपये - मोसंबी६० रुपये - स्ट्रॉबेरी६० रुपये - आंबा४० रुपये - केळी (डझन)वरील दर प्रति एका किलोचे'सध्या वातावरण अत्यंत प्रतिकूल असल्याने बाजारात फळाची आवक कमी झाली आहे. त्यामुळे फळांचे दरही वाढले आहेत. परंतु आता पावसाला सुरूवात झाली असून येत्या महिनाभरात फळांची आवक वाढून दर सुद्धा कमी होती'- विनोद मौर्या, फळविक्रेता, कल्याण