शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

देशात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अन्यायच झाला - नितीन गडकरी

By admin | Updated: February 26, 2017 23:03 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 26 - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी देशासाठी केलेला त्याग हा निश्चितच मौलिक होता. त्याग, समर्पण, देशभक्ती यांचे ते परमोच्च उदाहरण होते. त्यांची निष्ठा, लेखन, साहित्य, समाजकार्य, विचार आणि वक्तृत्व यांना तोडच नव्हती. मात्र आपल्या देशात सावरकर अनेकांना समजलेच नाहीत. त्यांच्यावर सातत्याने अन्यायच झाला, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी गडकरी बोलत होते.सावरकर यांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात अनेक तरुणांचे स्फुल्लिंग जागृत केले. सोबतच त्यांनी हिंदुत्वाची सर्वसमावेशक व्याख्या केली. समाजातील जातीय भेदाभेद दूर व्हावा यासाठी ते झटले. मात्र स्वातंत्र्याअगोदर व नंतरही त्यांची उपेक्षाच झाली. म्हणूनच त्यांना वेळोवेळी विरोध झाला. मात्र जर सावरकर देशभक्त नसतील, तर देशात एकही देशभक्त नाही, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. सावरकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आतापर्यंत दुर्दैवाने त्यात हवे तसे यश आलेले नाही. सावरकरांच्या विचारांचा हिंदूधर्मातील लोकांनी आदर केला असला तर आज देशाचे सामाजिक चित्र हे फार वेगळे व सुधारणावादी असते. सावरकरांच्या विचारांतील हिंदुत्व हे देशाच्या भविष्याचे राष्ट्रीयत्व आहे. नवीन पिढ्यांपर्यंत सावरकरांचे विचार पोहोचविले पाहिजेत, असे आवाहन गडकरी यांनी केले.