शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

स्वराज्य..! दिल्लीत पुन्हा घुमणार लोकमान्य टिळकांचा आवाज; महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल

By admin | Updated: January 25, 2017 15:17 IST

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वीच त्यामध्ये सहभागी होणा-या चित्ररथांची स्पर्धा भरवण्यात येते, त्यामध्ये टिळकांचे व्यक्तीमत्व सादर करणा-या महाराष्ट्राच्या चित्ररथाने अव्वल क्रमांक पटकावला आहे.

ऑनलाइनन लोकमत
नवी दिल्ली / मुंबई, दि. २५ - 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी घोषणा देत इंग्रजांना सळो की पळो करणारे लोकमान्य टिळक यांचा आवाज राजधानी दिल्लीत पुन्हा घुमणार आहे. आणि औचित्य आहे प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावर होणारे संचलन. या संचलनात महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयातर्फे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्त्व अधोरेखित करणारा चित्ररथ सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनापूर्वीच या चित्ररथांची एक स्पर्धा भरवण्यात येते, ज्यामध्ये ' महाराष्ट्राचा चित्ररथ' अव्वल ठरला आहे. तर दुस-या क्रमांकावर आहे तामिळनाडूचा चित्ररथ. 
 
कसा असेल महाराष्ट्राचा चित्ररथ?
या चित्ररथाद्वारे टिळकांचे बहुआयामी व्यक्तीमत्व सादर करण्यात येणार आहे. लोकमान्यांच्या १६0व्या जयंती वर्षानिमित्त स्वातंत्र्य चळवळीत टिळकांचे योगदान, पारतंत्र्यात ‘केसरी’ व ‘मराठा’ वृत्तपत्रांनी  चालवलेली सामाजिक जागृती, शिवजयंती व गणेशोत्सव सुरू करून महाराष्ट्रातील जनतेसह भारतीयांना सांस्कृतिक व्यासपीठांवर संघटित करण्यासाठी टिळकांनी हाती घेतलेली मोहीम, ब्रिटिश सरकारने टिळकांविरुद्ध चालवलेले खटले, शिक्षण व व्यायामाला टिळकांनी दिलेले विशेष प्रोत्साहन या बाबींचा चित्ररथात समावेश आहे. 
चित्ररथाच्या प्रारंभी लोकमान्य टिळकांचा अग्रलेख लिहितानाचा १५ फूट उंचीचा भव्य पुतळा असून, पुतळ्यामागे टिळकांनी ‘केसरी’ व ‘मराठा’च्या छपाईसाठी १९१९ साली लंडनहून मागवलेल्या डबल फिल्टर प्रिंटिंग मशिनवर छपाई होत असलेले वृत्तपत्र दर्शवण्यात आले आहे. चित्ररथाच्या मध्यभागी फिरत्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज व श्रीगणेशाच्या मूर्तींची स्थापना करण्यात आली आहे. चित्ररथाच्या उजव्या व डाव्या बाजूला बंगालच्या फाळणीनंतर मुंबई हायकोर्टात टिळकांविरुद्ध चाललेला खटला व मंडालेच्या तुरुंगातील त्यांंचा कारावास दर्शवण्यात आला आहे. चित्ररथाच्या शेवटच्या भागात व्यायामाला व शिक्षणाला महत्त्व देणाऱ्या टिळकांच्या स्मृती जागवण्यासाठी मल्लखांब व कुस्ती खेळणारी मुले तसेच बाकावर बसलेल्या शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींचे लाइव्ह प्रदर्शन आहे.
चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच त्रिमिती विख्यात कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांनी तयार केली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४0 कारागिरांनी हा अतिशय लक्षवेधी चित्ररथ तयार केला आहे. रायगड जिल्ह्यातील उरणच्या रूद्राक्ष ग्रुपच्या २८ कलाकारांचे पथक राजपथावर चित्ररथाच्या दोन्ही बाजूंना ‘पहिलं नमन हो करितो वंदन, ऐका तुम्ही हो गुणीजन करितो कथन’ या गीतावर नृत्य सादर करणार आहे. मुंबईतल्या दादर येथील समर्थ व्यायाम मंदिराचे ३ क्रीडापटू चित्ररथावर मल्लखांब व कुस्तीची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.