शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

स्वराज, राजेंना पाठिंबा, मग मारियांना वेगळा न्याय का - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 24, 2015 11:26 IST

ललित मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंच्या पाठिशी ठामपणे उभा असताना राकेश मारियांना वेगळा न्याया का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - ललित मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज, वसुंधरा राजेंच्या पाठिशी ठामपणे उभा असताना राकेश मारियांना वेगळा न्याया का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. तसेच मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल, या नायट्याने नाहक बळी जाऊ नयेत अशी अपेक्षा व्यक्त करत हा प्रकार थांबवावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे. आयपीएलमधील गैरव्यवहारप्रकरणातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी लंडनमध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची भेट घेतली होती, त्यावरून वाद सुरू असतानाचा भाजपाने मारिया यांच्याकडून याप्रकरणी स्प्ष्टीकरण मागवले होते. त्याच पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून मारियांची पाठराखण करण्यात आली आहे. राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणांसाठी अधिकारी विनाचौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील, असा इशाराही लेखातून देण्यात आला आहे.  
मोदी प्रकरणात भाजपा सुषमा स्वराज , वसुंधरा राजे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.  मग तोच न्याय राकेश मारिया यांच्यासारख्या शूर अधिकार्‍यांना का नसावा? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे. तसेच मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया यांनी मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात जे अजोड काम केले आहे ते  पाहता त्यांच्या व ललित मोदींच्या भेटीचा बागुलबुवा उभा करणं म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखे आहे, असेही लेखात नमूद करण्यात आले आहे. 
काय म्हटले आहे अग्रलेखात
- केंद्रातले मंत्री, राजस्थानच्या मुख्यमंत्री यांच्यावर मोदीप्रकरणी आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच मुंबईचे जोरकस पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही ललित मोदीप्रकरणी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा बकवास प्रयत्न सुरू आहे. राकेश मारिया लंडन येथे एका कॉन्फरन्ससाठी गेले असताना ललित मोदी त्यांना स्वत:ची कैफियत सांगण्यासाठी भेटले. इंग्लंड हा स्वतंत्र देश आहे व त्या देशाच्या परवानगीने ललित मोदी तेथे वास्तव्यास आहेत. मोदी यांनी हिंदुस्थानात ‘आयपीएल’मध्ये जे दिवे लावले तो वादाचा विषय असला तरी लंडन येथे मोदी यांना बेड्या ठोकून मुंबई किंवा दिल्लीत फरफटत आणण्याचा अधिकार मुंबईच्या आयुक्तांना नाही. परदेशात मंत्री किंवा पोलीस अधिकार्‍यांसमोर कोण अचानक ‘दत्त’ म्हणून उभे राहील व फोटो काढले जातील याचा नेम नाही. ललित मोदी हे देशात ‘आयपीएल’ क्रिकेटचे बादशहा असताना देशातील सर्वच राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे ‘हसरे’ फोटो प्रसिद्ध झाले आहेत. या सगळ्यांवर आता कारवाई करणार काय?
- हे मोदी मारियांना भेटले व मारिया यांनी त्यांना मुंबईत येऊन कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची सूचना केली. मारियांनी मुंबईत येऊन मोदी भेटीबाबतचा तपशील गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कळवला. एक सरकारी अधिकारी यापेक्षा दुसरे काय करू शकतो? 
- मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून राकेश मारिया यांनी दहशतवाद्यांसाठी ‘सॉफ्ट टार्गेट’ असलेल्या आणि ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी दुरवस्था झालेल्या मुंबईच्या सुरक्षेसंदर्भात जे अजोड काम केले आहे ते कसे विसरता येईल? मुंबईच्या सुरक्षेचे आव्हान मारिया यांनी यशस्वीपणे पेलले. येथील गँगवॉर मोडून काढले. गुंडगिरीला लगाम लावला. दहशतवादी कारवायांना आळा बसण्यासाठी उपाययोजना केली. ‘२६/११’च्या भीषण दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील त्यांचे योगदान मोठेच आहे. असे सगळे असताना त्यांच्या ललित मोदी भेटीचा बागुलबुवा उभा करणे म्हणजे राईचा पर्वत करण्यासारखेच आहे. 
- ललित मोदी प्रकरणात भाजप सुषमा स्वराज व वसुंधरा राजे यांच्या मागे ठामपणे उभा आहे व विरोधकांनी कितीही बोंबा मारल्या तरी तुमच्या पदांना धोका नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ललित मोदी प्रकरणात केंद्र सरकारची व भाजपची भूमिका काय आहे हे काय आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगायला हवे? मग तोच न्याय राकेश मारिया यांच्यासारख्या शूर अधिकार्‍यांना का नसावा? 
- राजकारण्यांना सर्व गुन्हे माफ व त्याच कारणांसाठी अधिकारी विनाचौकशी फासावर जाणार असतील तर त्याचे परिणाम राज्याला भोगावे लागतील. ललित मोदी प्रकरणातील सत्य काय हे आज कोणीच सांगू शकत नाही. मोदी प्रकरणाचा नायटा जितका खाजवाल तितका तो वाढतच जाईल. या नायट्याने नाहक बळी जाऊ नयेत, हीच माफक अपेक्षा!