शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘स्वाभिमान’ने दिली भाजपाला सोडचिठ्ठी,

By admin | Updated: February 15, 2017 19:49 IST

राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत

नाशिक : राज्यात विधानसभेला भाजपासोबत असलेले एकेक घटक पक्ष भाजपाची संगत सोडत असून, काल बुधवारी (दि.१५) नाशिकला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक गट व एक गण वगळता जिल्हा परिषदेच्या ७२ गट व १४५ गणांसाठी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वाभीमानी शेतकरी पक्षाचे सरकारातील मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावरून पक्षाचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतूरा सुरू असतानाच स्वाभीमानीने शिवसेनेला जवळ करीत भाजपाला दणका दिला आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सरकारातील घटक पक्षांनी या निवडणूकीत भाजपाकडे काही जागा मागितल्या होत्या. त्या न दिल्यास स्वबळावर निवडणूक लढविण्याचा इशारा दिला होता. तथापि, भाजपाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने भाजपा विरूध्द स्वतंत्र भूमिका जाहिर करण्यात येईल असे, हंसराज वडघुले यांनी अगोदरच स्पष्ट केले होते. दरम्यान, स्वाभिमान शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या निफाड तालुक्यातील देवगाव जिल्हा परिषद गटातून शिवनाथ जाधव व सिन्नर तालुक्यातील पांगरी गणातून रवींद्र पगार यांना उमेदवारी दिली आहे. हे दोन अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व गट व गणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. भारतीय जनता पार्टीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिलेले आश्वासन पाळले नसल्याचा आरोप यावेळी गोविंद पगार व हंसराज वडघुले यांनी केला. भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याची भूमिका शेतकरी वर्गात आहे. वर्षभरात कांदा तसेच विविध भाजीपाला पिकांना मातीमोल भाव आहे.