शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

शाश्वत विकासाचा ध्यास

By admin | Updated: May 1, 2017 05:18 IST

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे

 राजेंद्र शर्मा / धुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनतर्फे ‘भारत परिवर्तन कार्यक्रम’ राबविण्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड केली.धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा शाश्वत विकास करण्यासाठी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनने १ नोव्हेंबर २०१० पासून कामाला सुरुवात केली. सहा वर्षांत ६४५ गावांमध्ये ग्रामीण विकास व उपजीविका सुधार अंतर्गत विविध उपक्रम राबवून सुमारे ८५ हजार कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यात यश आले आहे. त्यासाठी २०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे पथक कार्यरत आहे.कृषी विकासमुख्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी संस्था क्षमता बांधणी, तंत्रज्ञानाची मदत घेण्याबरोबरच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते उपलब्ध करुन देत आहे. भात, सोयाबीन व कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना संस्थेमार्फत सहाय्य करण्यात आले. भाजीपाला, फुलशेती व फळबाग लागवडीद्वारे सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत नेण्यात संस्थेला यश मिळाले. नापिक, चढउताराच्या चार हजार एकरहून अधिक जमिनीचे सपाटीकरण करुन ती पिकाखाली आणण्यात आली. त्याचा ६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला.पशुधन विकास पशुधन विकासाच्या उपक्रमांतर्गत ३ हजार कुटुंबांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. संस्थेने स्वत:ची दुध संकलन केंद्रे उभारली आहेत. नाबार्डच्या सहाय्याने ९ कृत्रिम रेतन केंद्र उभारण्यात आली असून त्याचा ५५ गावांना लाभ होत आहे. १ हजार कुटुंबांनी शेळीपालन व २ हजार कुटुंबानी कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसाय सुरु केले. कौशल्य विकास : गरीब कुटुंबातील युवक - युवतींसाठी किमान कौशल्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १७ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन ५ हजार युवकांनी व्यवसाय सुरु केला आहे. विविध लघु उद्योगासाठी १० ते ४५ हजारांपर्यंत संस्थेकडून वित्त पुरवठा करण्यात येतो. संस्थेने विविध बँकाकडून सुमारे २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.आठवडे बाजार आठवडी बाजारांची जागा विकसित करण्यात आली. १६ गावांमध्ये शेतकरी व छोट्या विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे, शेड, पाणी व्यवस्था आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.जलसंधारण७८ गावात ८५ सिमेंट बंधारे, ८८ बंधाऱ्यांची दुरुस्ती, ११० नाला खोलीकरणाची कामे केली आहे. त्यामुळे ११ हजार शेतकऱ्यांना शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध झाले. त्यातून १२ हजार एकर जमीन तीनही हंगामात ओलिताखाली आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे १ हजार शेतकऱ्यांची देशबंधू अ‍ॅग्रो रिसर्च सेंटर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे शेतकरी व ग्राहक थेट जोडण्याचे काम सुरू आहे. कंपनीची दीड कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल झाली आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात उत्पादन कंपन्या स्थापन झाल्या आहेत.