शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
4
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
5
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
6
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
7
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
8
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
9
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
10
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
11
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
12
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
13
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
14
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
15
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
16
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
17
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
18
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
19
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
20
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन

शाश्वत विकासाचा ध्यास

By admin | Updated: May 1, 2017 05:18 IST

राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे

 राजेंद्र शर्मा / धुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी धुळे २९ व्या क्रमांकावर आहे. मॉडेल जिल्हा निर्माण करण्याच्या उद्देशाने लुपिन लिमिटेड या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. देशबंधू गुप्ता यांनी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनतर्फे ‘भारत परिवर्तन कार्यक्रम’ राबविण्यासाठी धुळे जिल्ह्याची निवड केली.धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचा शाश्वत विकास करण्यासाठी देशबंधू आणि मंजू गुप्ता फाउंडेशनने १ नोव्हेंबर २०१० पासून कामाला सुरुवात केली. सहा वर्षांत ६४५ गावांमध्ये ग्रामीण विकास व उपजीविका सुधार अंतर्गत विविध उपक्रम राबवून सुमारे ८५ हजार कुटुंबांचे आर्थिक जीवनमान उंचाविण्यात यश आले आहे. त्यासाठी २०० प्रशिक्षित कार्यकर्त्यांचे पथक कार्यरत आहे.कृषी विकासमुख्य पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी संस्था क्षमता बांधणी, तंत्रज्ञानाची मदत घेण्याबरोबरच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते उपलब्ध करुन देत आहे. भात, सोयाबीन व कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी १७ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना संस्थेमार्फत सहाय्य करण्यात आले. भाजीपाला, फुलशेती व फळबाग लागवडीद्वारे सुमारे ३१ हजार शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापर्यंत नेण्यात संस्थेला यश मिळाले. नापिक, चढउताराच्या चार हजार एकरहून अधिक जमिनीचे सपाटीकरण करुन ती पिकाखाली आणण्यात आली. त्याचा ६ हजार शेतकऱ्यांना लाभ झाला.पशुधन विकास पशुधन विकासाच्या उपक्रमांतर्गत ३ हजार कुटुंबांनी दुग्ध व्यवसाय सुरु केला. संस्थेने स्वत:ची दुध संकलन केंद्रे उभारली आहेत. नाबार्डच्या सहाय्याने ९ कृत्रिम रेतन केंद्र उभारण्यात आली असून त्याचा ५५ गावांना लाभ होत आहे. १ हजार कुटुंबांनी शेळीपालन व २ हजार कुटुंबानी कुक्कुटपालन असे शेतीपूरक व्यवसाय सुरु केले. कौशल्य विकास : गरीब कुटुंबातील युवक - युवतींसाठी किमान कौशल्य उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत १७ हजार युवकांना प्रशिक्षण देऊन ५ हजार युवकांनी व्यवसाय सुरु केला आहे. विविध लघु उद्योगासाठी १० ते ४५ हजारांपर्यंत संस्थेकडून वित्त पुरवठा करण्यात येतो. संस्थेने विविध बँकाकडून सुमारे २५ कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत.आठवडे बाजार आठवडी बाजारांची जागा विकसित करण्यात आली. १६ गावांमध्ये शेतकरी व छोट्या विक्रेत्यांना बसण्यासाठी ओटे, शेड, पाणी व्यवस्था आदी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.जलसंधारण७८ गावात ८५ सिमेंट बंधारे, ८८ बंधाऱ्यांची दुरुस्ती, ११० नाला खोलीकरणाची कामे केली आहे. त्यामुळे ११ हजार शेतकऱ्यांना शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध झाले. त्यातून १२ हजार एकर जमीन तीनही हंगामात ओलिताखाली आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनी साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे १ हजार शेतकऱ्यांची देशबंधू अ‍ॅग्रो रिसर्च सेंटर प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आहे. त्याद्वारे शेतकरी व ग्राहक थेट जोडण्याचे काम सुरू आहे. कंपनीची दीड कोटींची वार्षिक आर्थिक उलाढाल झाली आहे. शिरपूर व साक्री तालुक्यात उत्पादन कंपन्या स्थापन झाल्या आहेत.